शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Archana Tiwari Case: प्रियकराचा मित्र अडकला अन् उघड झाला प्लॅन; अर्चना तिवारीचे १२ दिवस लपून राहण्याचे कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 08:01 IST

मध्य प्रदेशातून १३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.

Archana Tiwari Missing Case: मध्य प्रदेशच्या भोपाळमधून अचानक बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय वकील अर्चना तिवारीला पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाने स्वतःच संपूर्ण योजना आखली होती आणि ती नेपाळमध्ये निघून गेली होती. घरच्यांनी लग्नासाठी दबाव आणल्यामुळे अर्चनाने दुसऱ्या देशात पळून जाण्याचा निर्णय घेतला होता अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी तिला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतल्यानंतर चौकशीनंतर तिने हे सत्य उघड केलं.

मध्य प्रदेशच्या कटनी इथली रहिवासी असलेली आणि इंदौरमध्ये न्यायालयीन सेवेची तयारी करत असलेली अर्चना तिवारी ७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी निघाली होती. त्यासाठी तिने इंदूरहून कटनीला जाणारी नर्मदा एक्सप्रेस ट्रेन पकडली. पण प्रवासादरम्यान ती भोपाळमध्ये बेपत्ता झाली. त्यामुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. ट्रेनमध्ये तिच्या सीटवर तिचे सामान सापडलं होतं. यामुळे कुटुंबिय आणखी घाबरले आणि त्यांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.१३ दिवस विविध ठिकाणी अर्चनाचा शोध सुरु होता. शेवटी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील नेपाळ सीमेजवळ अर्चना सापडली.

भोपाळ रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत अर्चना तिवारीने सांगितले की तिचे कुटुंब तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासाठी जोडीदार शोधत होते. लग्नासाठी वारंवार येणाऱ्या दबावामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. तिचे लग्न एका पटवारी मुलाशी ठरवण्यात आल्याचे कुटुंबियांनी तिला सांगितले होते. ७ ऑगस्ट रोजी ती रक्षाबंधनासाठी नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून कटनीला निघाली, पण घरी जाण्यासाठी ती तयार नव्हती. तिने ठरवले की ती दिवाणी न्यायाधीश होईपर्यंत घरी जाणार नाही किंवा लग्न करणार नाही. अर्चनाने ही सगळी योजना तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत मिळून आखली होती.

"७ ऑगस्टच्या रात्री इंदूर-बिलासपूर ट्रेनने प्रवास करणारी अर्चना तिवारी बेपत्ता झाली आणि १३ दिवसांनी ती नेपाळ सीमेवरून सापडली. पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने त्यांना सर्व काही सांगितले. अर्चनाने सांगितले की तिचे कुटुंब तिच्यासाठी मुलगा शोधत होते, पण तिला आत्ता लग्न करायचे नव्हते. जानेवारीमध्ये तिची सरांश चोपचेनशी मैत्री झाली होती, ज्याच्यासोबत तिला राहायचं होतं. लग्नावरुन अर्चनाचा कुटुंबाशी खूप वाद झाला. तिने सरांशला कुटुंबाशी झालेल्या वादाबद्दल आणि तिच्यासाठी शोधलेल्या मुलाबद्दल सांगितले. त्यानंतर सरांश आणि अर्चनाने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये तेजिंदर सिंगने त्यांना मदत  केली. तिघेही हरदा येथे भेटले आणि त्यांनी अशी योजना आखली की ते एका नवीन ओळखीसह नवीन ठिकाणी जातील आणि एक नवीन जीवन सुरू करतील. त्यांनी एका मुलीच्या ट्रेनमधून पडल्याची बातमी पसरवण्याचा कटही रचला," अशी माहिती पोलिसांनी दिली.

"तिघेही ट्रेनमध्ये चढले आणि अचानक तेजिंदरने अफवा पसरवली की मुलगी ट्रेनमधून पडली आहे, तर सारांश आणि अर्चना ट्रेनमधून उतरल्यानंतर पळून गेले होते. तेजिंदरला आरपीएफने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीदरम्यान त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा आढळून आल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याला आपल्यासोबत नेले. पण तेजिंदरने संपूर्ण कट उघड केला. अर्चनाने तिचे सर्व सामान ट्रेनच्या सीटवर सोडले होते, जेणेकरून सर्वांना वाटेल की ती पळून गेली नाही तर पडली आहे. जेव्हा प्रकरण वाढू लागले तेव्हा अर्चना आणि सरांश यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच ते नेपाळला पोहोचले. ते नेपाळमार्गे दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करत होते," असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसNepalनेपाळ