शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Anis Khan Death: युवकाच्या हत्येचं गूढ वाढलं, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन पेटलं; ‘तो’ पोलिसवाला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 08:07 IST

हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला.

कोलकाता – जेव्हा कुणाचा खून झाला तर लोकं पोलिसांकडे जातात. परंतु पोलिसांच्या वर्दीतच खूनी असेल तर सर्व हैराण होतील. कोलकातामध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी एक विद्यार्थी मागील ५ महिन्यांपासून विद्यापीठ विरोधात आंदोलन करत होता. १९ फेब्रुवारीला रात्री त्याच विद्यार्थ्याच्या घरी ४ लोक अचानक घुसले. ज्यात एक पोलिसवाला होता. त्यानंतर या चौघांनी विद्यार्थ्याला घराच्या तिसऱ्या मजल्यावर नेले आणि त्याठिकाणाहून खाली फेकून दिले.

आता या विद्यार्थ्याच्या हत्येत सहभागी असणारा तो पोलिसवाला कोण? यावर कोलकातामध्ये खळबळ माजली आहे. कोलकाता पश्चिम येथून ५० किलोमीटर दूर हावडा येथे ही घटना घडली आहे. ज्यामुळे केवळ याच परिसरातच नव्हे तर राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अर्ध्या रात्री ४ जण घरात घुसले आणि घरच्यांना अनीस खानबाबत विचारणा केली. मात्र उत्तर मिळण्यापूर्वीच ते घराच्या छतावर गेले. यात ४ जणांमध्ये १ पोलिसही होता.ज्याच्याकडे पिस्तुल होती. घरच्यांनी त्यांना विरोध केला परंतु ते कुणालाही न जुमानता थेट अनीसला पकडलं आणि बेदम मारहाण करत तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. घरचे त्यांना रोखत होते पण मोठी हानी झाली. या चौघांनी अनीसला घरच्या तिसऱ्या मजल्यावर खाली फेकले. त्यात अनीसचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला. जेव्हा घरचे आमता पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या घरी कोण आलं होतं आणि अनीसला छतावरुन खाली कुणी फेकलं याची माहिती नाही. घरचे ज्यांना पोलीस समजत होते ते खरेच पोलीस होते का? असा सवाल उभा राहिला. त्यामुळे घरच्यांनाही मोठा धक्का बसला.

अनीस खानचा जीव घेणारे पोलीस नव्हते मग कोण होते? १९ फेब्रुवारीच्या रात्री घरात घुसणारे आरोपी कुणी पाठवले होते? त्यातील एकाने पोलिसाचा गणवेश कसा घातला होता? त्याच्याकडे गन कशी होती? का हे सगळं बनावट होतं? या सगळ्या प्रश्नांनी हे प्रकरण चर्चेत आलं आहे. अनीसच्या मृत्यूचं प्रकरण जितकं सोप्पं वाटतं तितकं सोप्पं नाही. कारण अनीस खानला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात विरोध प्रदर्शन सुरु आहे.

कोण आहे अनीस खान?

मागील १३७ दिवसांपासून अनीस खान आलिया विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरुन प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहे. धरणं आंदोलन करतोय. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरुन अनीसनं विद्यापीठाविरोधात आवाज उचलला. जवळपास १३० कोटी अनुदान अद्यापही थकीत आहे. राज्य सरकारकडून यूनिवर्सिटीला आतापर्यंत केवळ १३ कोटी मिळाल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनीसच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल