शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Anis Khan Death: युवकाच्या हत्येचं गूढ वाढलं, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन पेटलं; ‘तो’ पोलिसवाला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 08:07 IST

हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला.

कोलकाता – जेव्हा कुणाचा खून झाला तर लोकं पोलिसांकडे जातात. परंतु पोलिसांच्या वर्दीतच खूनी असेल तर सर्व हैराण होतील. कोलकातामध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी एक विद्यार्थी मागील ५ महिन्यांपासून विद्यापीठ विरोधात आंदोलन करत होता. १९ फेब्रुवारीला रात्री त्याच विद्यार्थ्याच्या घरी ४ लोक अचानक घुसले. ज्यात एक पोलिसवाला होता. त्यानंतर या चौघांनी विद्यार्थ्याला घराच्या तिसऱ्या मजल्यावर नेले आणि त्याठिकाणाहून खाली फेकून दिले.

आता या विद्यार्थ्याच्या हत्येत सहभागी असणारा तो पोलिसवाला कोण? यावर कोलकातामध्ये खळबळ माजली आहे. कोलकाता पश्चिम येथून ५० किलोमीटर दूर हावडा येथे ही घटना घडली आहे. ज्यामुळे केवळ याच परिसरातच नव्हे तर राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अर्ध्या रात्री ४ जण घरात घुसले आणि घरच्यांना अनीस खानबाबत विचारणा केली. मात्र उत्तर मिळण्यापूर्वीच ते घराच्या छतावर गेले. यात ४ जणांमध्ये १ पोलिसही होता.ज्याच्याकडे पिस्तुल होती. घरच्यांनी त्यांना विरोध केला परंतु ते कुणालाही न जुमानता थेट अनीसला पकडलं आणि बेदम मारहाण करत तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. घरचे त्यांना रोखत होते पण मोठी हानी झाली. या चौघांनी अनीसला घरच्या तिसऱ्या मजल्यावर खाली फेकले. त्यात अनीसचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला. जेव्हा घरचे आमता पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या घरी कोण आलं होतं आणि अनीसला छतावरुन खाली कुणी फेकलं याची माहिती नाही. घरचे ज्यांना पोलीस समजत होते ते खरेच पोलीस होते का? असा सवाल उभा राहिला. त्यामुळे घरच्यांनाही मोठा धक्का बसला.

अनीस खानचा जीव घेणारे पोलीस नव्हते मग कोण होते? १९ फेब्रुवारीच्या रात्री घरात घुसणारे आरोपी कुणी पाठवले होते? त्यातील एकाने पोलिसाचा गणवेश कसा घातला होता? त्याच्याकडे गन कशी होती? का हे सगळं बनावट होतं? या सगळ्या प्रश्नांनी हे प्रकरण चर्चेत आलं आहे. अनीसच्या मृत्यूचं प्रकरण जितकं सोप्पं वाटतं तितकं सोप्पं नाही. कारण अनीस खानला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात विरोध प्रदर्शन सुरु आहे.

कोण आहे अनीस खान?

मागील १३७ दिवसांपासून अनीस खान आलिया विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरुन प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहे. धरणं आंदोलन करतोय. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरुन अनीसनं विद्यापीठाविरोधात आवाज उचलला. जवळपास १३० कोटी अनुदान अद्यापही थकीत आहे. राज्य सरकारकडून यूनिवर्सिटीला आतापर्यंत केवळ १३ कोटी मिळाल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनीसच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल