शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

Anis Khan Death: युवकाच्या हत्येचं गूढ वाढलं, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन पेटलं; ‘तो’ पोलिसवाला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 08:07 IST

हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला.

कोलकाता – जेव्हा कुणाचा खून झाला तर लोकं पोलिसांकडे जातात. परंतु पोलिसांच्या वर्दीतच खूनी असेल तर सर्व हैराण होतील. कोलकातामध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी एक विद्यार्थी मागील ५ महिन्यांपासून विद्यापीठ विरोधात आंदोलन करत होता. १९ फेब्रुवारीला रात्री त्याच विद्यार्थ्याच्या घरी ४ लोक अचानक घुसले. ज्यात एक पोलिसवाला होता. त्यानंतर या चौघांनी विद्यार्थ्याला घराच्या तिसऱ्या मजल्यावर नेले आणि त्याठिकाणाहून खाली फेकून दिले.

आता या विद्यार्थ्याच्या हत्येत सहभागी असणारा तो पोलिसवाला कोण? यावर कोलकातामध्ये खळबळ माजली आहे. कोलकाता पश्चिम येथून ५० किलोमीटर दूर हावडा येथे ही घटना घडली आहे. ज्यामुळे केवळ याच परिसरातच नव्हे तर राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अर्ध्या रात्री ४ जण घरात घुसले आणि घरच्यांना अनीस खानबाबत विचारणा केली. मात्र उत्तर मिळण्यापूर्वीच ते घराच्या छतावर गेले. यात ४ जणांमध्ये १ पोलिसही होता.ज्याच्याकडे पिस्तुल होती. घरच्यांनी त्यांना विरोध केला परंतु ते कुणालाही न जुमानता थेट अनीसला पकडलं आणि बेदम मारहाण करत तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. घरचे त्यांना रोखत होते पण मोठी हानी झाली. या चौघांनी अनीसला घरच्या तिसऱ्या मजल्यावर खाली फेकले. त्यात अनीसचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे प्रकरण खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. कुटुंबीयांना पोलिसांकडे धाव घेतली. आरोपी पोलिसाला अटक होईल असं घरच्यांना वाटलं. परंतु यात एक ट्विस्ट आला. जेव्हा घरचे आमता पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या घरी कोण आलं होतं आणि अनीसला छतावरुन खाली कुणी फेकलं याची माहिती नाही. घरचे ज्यांना पोलीस समजत होते ते खरेच पोलीस होते का? असा सवाल उभा राहिला. त्यामुळे घरच्यांनाही मोठा धक्का बसला.

अनीस खानचा जीव घेणारे पोलीस नव्हते मग कोण होते? १९ फेब्रुवारीच्या रात्री घरात घुसणारे आरोपी कुणी पाठवले होते? त्यातील एकाने पोलिसाचा गणवेश कसा घातला होता? त्याच्याकडे गन कशी होती? का हे सगळं बनावट होतं? या सगळ्या प्रश्नांनी हे प्रकरण चर्चेत आलं आहे. अनीसच्या मृत्यूचं प्रकरण जितकं सोप्पं वाटतं तितकं सोप्पं नाही. कारण अनीस खानला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात विरोध प्रदर्शन सुरु आहे.

कोण आहे अनीस खान?

मागील १३७ दिवसांपासून अनीस खान आलिया विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरुन प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहे. धरणं आंदोलन करतोय. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानावरुन अनीसनं विद्यापीठाविरोधात आवाज उचलला. जवळपास १३० कोटी अनुदान अद्यापही थकीत आहे. राज्य सरकारकडून यूनिवर्सिटीला आतापर्यंत केवळ १३ कोटी मिळाल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनीसच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल