शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पत्नीवर राग; सासू-मेहुण्यासह स्वत:लाही जाळून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 08:16 IST

सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्क वरूड (जि. अमरावती) : मद्यधुंद अवस्थेत सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर मारेकरी जावयाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वंडली येथे रविवारी उशिरा रात्री उघड झाली. पोलिसांनी घरातून तिघांचेही कोळसा झालेले मृतदेह ताब्यात घेतले. सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले.

वंडली येथील लताबाई सुरेशराव भोंडे (४७), त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (२२) व मारेकरी आशिष ठाकरे (२५, रा. वरूड), अशी मृतांची नावे आहेत. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. रविवारी रात्री वंडली येथे भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याची माहिती  बेनोडा पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार स्वप्निल ठाकरे हे अग्निशमन दलासह घटनास्थळावर दाखल झाले. त्या घरात तीन व्यक्तींचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मिळून आले. 

लताबाई भोंडे यांच्या मुलीने सहा महिन्यांपूर्वी आशिष ठाकरे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. तो पत्नीला  दारू पिऊन नेहमी मारहाण करीत होता. त्यामुळे ती महिनाभरापूर्वी माहेरी वंडली येथे परतली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती