शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:09 IST

Crime UP : या व्यक्तीने आपल्या पत्नीचा आणि दोन मुलांचा अवघ्या २.२० लाख रुपयांत सौदा केला. इतकंच नाही तर, त्याने पत्नीला धमकी देखील दिली की, जर ती त्या व्यक्तीसोबत गेली नाही तर, तो दोन मुलांना मारून टाकेल. 

सध्या जगाच्या कानाकोपऱ्यातून नात्यांना काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच आता उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने बाहेर नेऊन आपल्याच पत्नी आणि मुलांना विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा आणि दोन मुलांचा अवघ्या २.२० लाख रुपयांत सौदा केला. इतकंच नाही तर, त्याने पत्नीला धमकी देखील दिली की, जर ती त्या व्यक्तीसोबत गेली नाही तर, तो दोन मुलांना मारून टाकेल. 

पतीने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेली पत्नी दोन मुलांना घेऊन परपुरुषासोबत गेली. मात्र, संधी मिळताच तिने मुलांना घेऊन पळ काढला. महिलेचा आरोप आहे की तिने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि आवश्यक ती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पतीने पत्नी आणि मुलांना विकलेही धक्कादायक घटना जौनपूरमध्ये घडली आहे. महाराजगंज पोलीस स्टेशन परिसरातील माजिठी गावात राहणारी पीडित शोभावती हिचा विवाह १५ वर्षांपूर्वी सिंगरामाऊ पोलीस स्टेशन परिसरातील खानपूर गावातील रहिवासी राजेशशी झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या. पीडित महिलेचा आरोप आहे की तिचा पती राजेश तिला रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने तिच्या घरातून बादलपूर तहसीलमध्ये घेऊन गेला. तिचा धाकटा मुलगा सर्वेश आणि मुलगी अंशिका देखील तिच्यासोबत गेले. बादलपूरला पोहोचताच पतीने त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांना पूर्वनियोजित आरोपींना दोन लाख वीस हजार रुपयांना विकले. जेव्हा पीडित महिलेला कळले की तिचा पती तिला विकत आहे, तेव्हा तिने विरोध केला.

मुलांना जीवे मारण्याची धमकी दिलीपण तिला विकत घेणाऱ्या आरोपीने तिला शस्त्राचा धाक दाखवून शांतपणे त्यांच्यासोबत येण्याची धमकी दिली. पीडितेने सांगितले की जर तिने असे केले नाही तर आरोपीने दोन्ही मुलांना मारण्याची धमकी त्यांनी दिली होती. पीडितेचा पती राजेशने आरोपी मुन्शी हरिजन यांना फोन केला, ज्याने दोन लाख वीस हजारांची सौदाबाजी केली आणि दोन ते चार दिवस त्याची सेवा करण्याचे आमिष दाखवून तिला फसवले. पत्नीला विकल्यानंतर आरोपी पतीने त्याच्या सासरच्या लोकांना सांगितले की, त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन पळून गेली आहे.

पोलिसांनी कारवाई केलीसासरच्यांना त्याच्या कृत्याचा संशय येऊ नये म्हणून पतीने असे म्हटले. दुसरीकडे संधी साधून पीडिता पळून गेली आणि तिच्या माहेरी पोहोचली. तिने तिच्या पालकांना तिच्यावर झालेला अत्याचार सांगितल्यावर, तिच्या पालकांनी तिला महाराजगंज पोलीस ठाण्यात नेले. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप आहे. जेव्हा जौनपूर पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणातही कोणतीही कारवाई करणे योग्य मानले नाही, तेव्हा पीडितेने वकिलामार्फत जिल्हा न्यायालयात अपील केले.

न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवलाप्रकरणाचे गांभीर्य पाहून न्यायालयाने जौनपूर पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर, पोलिसांनी आरोपी पती राजेश, अशोक, मुन्शी हरिजन आणि पत्नीला विकणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार