शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी गौडबंगाल; आई वडिलांनी घेतली माघार; वकील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:27 IST

आजच्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहणार असल्याचं सांगितले.

मुंबई - सगळं काही अक्षय शिंदेंला न्याय मिळण्याच्या बाजूने प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी त्याचे आई वडील माघार घेतायेत. यात पुढे कुणाला धोका असू शकतो हे शोधायला हवं. सध्या त्याच्या आई वडिलांना कुणाचा धोका आहे. हे सर्व काही मी कोर्टात मांडणार आहे. थोडे थांबा, यातीलही अनेक आका बाहेर येतील. या प्रकरणात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे हे सर्वांनाच दिसून येतंय असं बदलापूर एन्काऊंटर प्रकरणातील अक्षय शिंदे यांचे वकील अमित कटारनवरे यांनी सांगितले.

आज बदलापूर प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर अक्षय शिंदेंच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अमित कटारनवरे म्हणाले की, एन्काऊंटर प्रकरणात एडीएसची चौकशी पोलीस करतायेत. त्याचा अहवाल एफआयआरमध्ये होऊ शकत नाही. अक्षय शिंदेविरोधात तपास सुरू आहे असं राज्य सरकारच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. मग आम्ही त्यावर साधा प्रश्न विचारला तपास करून खटला कुणाविरोधात चालवणार मेलेल्या माणसाविरोधात? न्यायाधीशांनी जो अहवाल दिलाय, संबंधितांवर गुन्हा दाखल होणार की नाही हे प्रश्न आम्ही कोर्टात उपस्थित केले असं त्यांनी सांगितले.

तसेच मागील सुनावणीत आम्हाला वकील नको असं आई वडिलांकडून खोटं लिहून घेतले, वकील बदलायला दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी समोर येऊन वकील बदलायचं आमचं म्हणणं नाही. संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही असं अमित काटरनवरे यांनी म्हटलं. आजच्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहणार असल्याचं सांगितले. २४ फेब्रुवारीला याबाबत सुनावणी होईल. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नाही असं कोर्टाने सांगितले. तर आई वडिलांनी माघार घेतली तरी आम्ही लढा सुरूच ठेवणार असं वकील अमित कटारनवरे यांनी म्हटलं.   

दरम्यान, अक्षय शिंदे प्रकरणात त्याच्या आई वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु गुरुवारी अक्षयच्या आई वडिलांनी आम्हाला खटला लढवायचा नाही. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही असं अक्षय शिंदेंच्या आई वडिलांनी म्हटलं होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही सुनावणी सुरूच राहणार असून पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbadlapurबदलापूर