शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 09:17 IST

गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

- सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मुलांपेक्षा संपत्ती अधिक प्रिय होती. त्यांना महिन्याचे दीड लाखाहून अधिक उत्पन्न येत असतानाही कुटुंबाच्या गरजा भागवण्यात हात आखडता घेण्याची सवय होती. यातूनच स्वतः वापरत असलेल्या गाडीच्या दुरुस्ती व इन्शुरन्सचे पैसे थकीत ठेवले होते. याबाबत मुलाने ऐकवल्याच्या रागातून त्यांनी गोळी झाडल्याचे उघड झाले. 

निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ऐरोलीत घडली. यामध्ये दोन गोळ्या लागल्याने विजय याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा मुलगा सुजय याची प्रकृती स्थिर आहे. भगवान हे ऐरोली सेक्टर ३ येथे पत्नी, मोठा अपंग मुलगा अजय, त्याची पत्नी व दोन मुले यांच्यासह राहायला आहेत. दहा वर्षांपूर्वी ते नवी मुंबई पोलीस दलाच्या सुरक्षा शाखेतून निवृत्त झाले असून त्यापूर्वी रबाळे, तुर्भे पोलीस ठाण्यात त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा मधला मुलगा विजय हा वसईला व लहान मुलगा सुजय हा ऐरोलीतच काही अंतरावर राहायला आहे. 

भगवान यांनी स्वतः वापरत असलेल्या इनोव्हा कारच्या दुरुस्तीचे व इन्शुरन्सचे सुमारे १२ हजार रुपये थकवले होते. पोलिसाचा रुबाब झाडून बिलाचे पैसे थकीत ठेवण्याची त्यांना सवय असल्याची चर्चा परिसरात आहे. यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीसाठी अनेक जण मुलांना फोन करायचे. अशाच प्रकारातून गाडीच्या विम्याच्या व दुरुस्तीच्या थकीत पैशासाठी संबंधिताने विजयला फोन केला होता. त्यावरून विजयने वडिलांना फोन करून थकीत पैसे भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी त्याला घरी बोलावले होते. त्यानुसार संध्याकाळी विजय हा वसईवरून ऐरोलीला आला असता झालेल्या भांडणातून भगवान यांनी विजयवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घरातच उपस्थित असलेल्या सुजयवर देखील गोळी झाडली. परंतु ती गोळी सुजयच्या पोटाला घासून गेल्याने तो बचावला. 

घरखर्चात आखडता हात भगवान यांची खारघर, ऐरोली व इतर ठिकाणी घरे असून ती भाड्याने दिलेली आहे. यातून त्यांना महिना दीड लाखाहून अधिक उत्पन्न मिळते. परंतु घरखर्चासाठी पत्नीला केवळ महिना १५ ते १७ हजार रुपये दिले जायचे. त्यामुळे घरखर्च भागवण्यास त्यांची पत्नी व मोठी सून जेवणाचे डबे पुरविण्याचे काम करतात. 

सुजयवरही होता जुना राग गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिस