शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

१३ वर्षांपूर्वी मोडलेला साखरपुडा; आता नंबर ब्लॉक करताच संतापली महिला, केला चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 10:24 IST

अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने १३ वर्षांनंतर एका तरुणावर चाकूने हल्लाही केला. १३ वर्षांपूर्वी महिलेच्या या व्यक्तीसोबत ठरलेला साखरपुडा मोडला होता. आता महिलेने तरुणावर हल्ला केला आणि विचारलं की, तू माझ्याशी का बोलत नाहीस आणि माझा नंबर का ब्लॉक केलास? महिलेने त्याच्या पोटावर, कंबरेवर आणि पाठीवर चाकूने तीन वार केले. यावेळी त्या तरुणाने कसा तरी आपला जीव वाचवला आणि पळून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली. जय नावाचा एक तरुण त्याच्या बाईकवरून कुठेतरी जात होता. त्याच क्षणी अचानक रिंकी नावाच्या महिलेने जयच्या बाईकला धडक दिली. यानंतर, तिने रागाने त्या तरुणाला तो तिच्याशी का बोलत नाही, त्याने तिचा नंबर का ब्लॉक केला हे विचारायला सुरुवात केली. यावरुन महिलेने तरुणावर चाकूने हल्ला केला.

१३ वर्षांपूर्वी रिंकीशी होणार होता साखरपुडा

चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेला जय आपला जीव वाचवण्यासाठी पळाला. त्याने एका वाहनाकडे लिफ्ट मागितली आणि घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर त्याने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. जय हा अहमदाबादच्या शेला भागातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचं १३ वर्षांपूर्वी रिंकीशी साखरपुडा होणार होता. यानंतर काही कौटुंबिक वादांमुळे हा साखरपुडा मोडला. २०१६ मध्ये जयने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. रिंकीचंही लग्न झालं.

संतापलेल्या रिंकीने केला हल्ला

गेल्या वर्षी रिंकीने अचानक जयला फोन केला आणि म्हणाली की जर त्यांचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. यानंतर, तिने संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण जयने नकार दिला. तरीही रिंकी त्याला सतत फोन करत राहिली. काही वेळाने तिने जयला सांगितलं की तिच्या पतीला त्यांच्या फोन कॉल्सबद्दल कळलं आहे. यानंतर, जयने तिचा नंबर ब्लॉक केला आणि तिचा फोन उचलणं बंद केलं. यामुळे संतापलेल्या रिंकीने त्याच्यावर हल्ला केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसahmedabadअहमदाबाद