शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

मागून तोंड धरलं, कटर काढलं अन्...; शाळेतल्या भांडणाचा असा घेतला सूड, विद्यार्थिनीला पडले ५० टाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:41 IST

दिल्लीत शाळेत झालेल्या भांडणातून एका विद्यार्थिनीवर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi Crime: शाळेमध्ये क्षुल्लक कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना होण्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. या प्रकरणांमध्ये काहीवेळा विद्यार्थ्यांचा जीवसुद्धा गेला आहे. विद्यार्थिनींच्या गटांमध्येही अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार दिल्लीत पाहायला मिळाला. दिल्लीत मुलींच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुलींच्या एका गटाने विद्यार्थिनीवर ब्लेडने (पेपर कापण्याचे कटर) सपासप वार केले. यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर ५० टाके पडले आहेत.

दिल्लीच्या अमन विहार परिसरातील शाळेत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी, एका विद्यार्थिनीने तिच्या बहिणीसह आणि इतर दोन विद्यार्थीनीसह मिळून बारावीच्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर ब्लेडने हल्ला केला. यामुळे पीडितेच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर ५० हून अधिक टाके घालावे लागले. हल्ला करणारी विद्यार्थिनी पीडितेच्या शाळेतीलच विद्यार्थीनी आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, किरकोळ वादातून मुलीवर हल्ला करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली असून मुलींनी केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. शिक्षक दिनी पीडिता आणि त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थीनींमध्ये भांडण झाले होत. या भांडणानंतर, हल्लेखोर विद्यार्थीनीने तिच्या काही मैत्रिणींसह हा हल्ला करण्याचा कट रचला, ज्यामध्ये शाळेतील आणि बाहेरील मुली होत्या.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडिता तिच्या मैत्रिणींसह शाळेतून घरी जात असताना, दुसऱ्या शाळेतील काही मुलींनी पीडितेला अडवले. सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली. त्यानंतर, एका मुलीने पीडितेला मागून चेहऱ्याला धरत तिच्यावर ब्लेडने हल्ला केला. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर खोल जखमा झाल्या. हल्ला करणाऱ्या मुलींचे वय १४ ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. शिक्षक दिनी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. पीडितेने सांगितले की, या मुलींनी यापूर्वीही तिचा छळ केला होता, पण तिने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. 

दरम्यान, या घटनेच्या दोन दिवसांनंतर पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. मात्र पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, निष्काळजीपणा दाखवला आणि धमकावण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस