शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ४ जणांची हत्या करणारा वेश बदलून बनला पुजारी; ४० वर्षांनी पोलिसांच्या तावडीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 12:37 IST

मैनपुरी येथे ५ जून १९७८ मध्ये जमिनीच्या वादावरून नंगला तारा गावांत ४ जणांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती.

ठळक मुद्दे मदन सिंह, महेंद्र सिंह, सरमन आणि ललित यांच्यावर यतेंद्र आणि त्याच्या ५ साथीदारांनी गोळीबार करून सामुहिक हत्या केली होतीया सहा आरोपींपैकी एकाला कोर्टाने निर्दोष ठरवलं. तर १९८१ मध्ये जनपद न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवलंया दोषींनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केले होते. तेव्हा हायकोर्टाने ५ जणांना जामीन दिला.

उत्तर प्रदेशच्या मैनपूरी पोलिसांनी ४० वर्षापासून मंदिरात वेष बदलून पुजारी म्हणून वावरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीवर तब्बल ४ जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी यतेंद्रला ४० वर्षापूर्वी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मैनपुरीच्या नगला तारा गावांत १९७८ मध्ये ४ लोकांची यतेंद्रनं हत्या केली होती. या हत्येनंतर पोलिसांनी यतेंद्रला अटक करून जेलमध्ये पाठवलं होतं.

परंतु १९८१ मध्ये हायकोर्टाने यतेंद्रला अटीशर्थीवर जामीन मंजूर केला होता. जामीन मिळताच यतेंद्र फरार झाला. त्यानंतर वेषांतर करून यतेंद्र ४० वर्ष पोलिसांच्या तावडीतून सुटला. मैनपुरी पोलिसांनी यतेंद्रला पकडून देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस घोषित केले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी यतेंद्रला पुन्हा बेड्या ठोकल्या.

काय आहे हे प्रकरण?

मैनपुरी येथे ५ जून १९७८ मध्ये जमिनीच्या वादावरून नंगला तारा गावांत ४ जणांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. मदन सिंह, महेंद्र सिंह, सरमन आणि ललित यांच्यावर यतेंद्र आणि त्याच्या ५ साथीदारांनी गोळीबार करून सामुहिक हत्या केली होती. या सहा आरोपींपैकी एकाला कोर्टाने निर्दोष ठरवलं. तर १९८१ मध्ये जनपद न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या दोषींनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केले होते. तेव्हा हायकोर्टाने ५ जणांना जामीन दिला. त्यानंतर पीडित सुप्रीम कोर्टात पोहचले. कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं.

त्यानंतर या ५ आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी पुन्हा पकडलं या दोन्ही आरोपींचा फतेहगड कारागृहात मृत्यू झाला. तर तिघं आरोपी रामकृपाल, यतेंद्र आणि गजेंद्र हे १९८१ पासून बेपत्ता झाले. कोर्टाने वारंवार पोलिसांना दोषींना अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तिघांवर प्रत्येकी १० हजारांचे बक्षीस ठेवले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यतेंद्र पुजारी हा वेश बदलून स्थानिक मंदिरात राहत असल्याचं कळालं. तर लखनौ येथे त्याचा मुलगा आणि पत्नी राहते. पोलिसांनी यतेंद्रला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, यतेंद्र कामख्या मंदिरात पुजारी बनून राहत होता. तर त्याचं कुटुंब लखनौ येथे वास्तव्यास होते. कधीकधी यतेंद्र त्याच्या कुटुंबांना भेटण्यासाठी लखनौला जात होता. कामख्या मंदिराची पुजारी म्हणून तो नाव बदलून राहत होता. पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही. आता पोलीस इतर दोन फरार आरोपींच्या शोधात आहेत.  

 

टॅग्स :Policeपोलिस