शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२३ दिवसांनी श्वानांमुळे उलगडलं महिलेच्या हत्येचं रहस्य; पतीसह ४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:34 IST

जोगेंद्रचे कुटुंबीयांतील एका महिलेशी अवैध संबंध असल्याचा सरिताला संशय असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नवी दिल्ली - अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं पती आणि सासरच्यांनी मिळून सरिताची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत गाडून टाकला. ८ मार्च रोजी ही घटना घडली परंतु २३ दिवसांनंतर शुक्रवारी कुत्र्यांनी दुर्गंधी येत असल्याने जमिनीची माती बाहेर काढली तेव्हा हा खून उघडकीस आला. सरिताला आपल्या पतीचे कुटुंबातील एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता असं पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली. 

पतीच्या या कृत्याला तिचा विरोध असायचा, या गोष्टीवरून अनेकदा तिचं पतीशी भांडण व्हायचे. या प्रकरणी पोलिसांनी सरिताचा पती जोगेंद्र उर्फ ​​लाला, सासू संता आणि वहिनी उषा यांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. ग्रेनो वेस्टमधील तुस्याना गावात राहणाऱ्या हरिओमची मुलगी सरिता हिचा विवाह डेरी कंबक्सपूर गावातील रहिवासी जोगेंद्रसोबत १६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला होता. सरिता ८ मार्च रोजी बेपत्ता झाली होती. ९ मार्च रोजी जोगिंदरने नॉलेज पार्क पोलिस ठाण्यात पत्नी सरिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तपास सुरू केला.

दुसरीकडे सरिताचा भाऊ नरेंद्र याच्या फिर्यादीवरून १५ मार्च रोजी पती जोगेंद्र, सासू सांता, दीर भूपेंद्र, वहिनी उषा, चुलत सासरे विजयपाल आणि इतर यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जोगेंद्रचे कुटुंबीयांतील एका महिलेशी अवैध संबंध असल्याचा सरिताला संशय असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पतीला तिचा विरोध होता. यावरून अनेकदा वादही झाले. मध्यरात्री जोगेंद्रने सरिताचा गळा आवळून खून केल्याचे आरोपींनी पोलिसांना कबुली दिली. जोगेंद्रसह भाऊ भूपेंद्र, वहिनी उषा आणि आई सांता यांनी त्याचा मृतदेह लपवला.

१२ मार्च २०२१ रोजी जेव्हा सरिताने पतीच्या अवैध संबंधांना विरोध केला तेव्हा तिच्यावर हल्ला करण्यात आला. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एनसीआरची नोंद केली होती. आरोपींनी फावड्याने खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला होता. हा फावडा पोलिसांनी जप्त केला आहे. 

मृतदेह लपवून पोलीस आणि ग्रामस्थांची दिशाभूलसरिताचा मृतदेह जमिनीत गाडल्यानंतर  आरोपी बेधडकपणे त्यांच्या घरीच राहिले. आरोपी जोगेंद्रने दुसऱ्या दिवशी बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. सरिता मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असे, असे सांगून आरोपी पोलिस व गावकऱ्यांची दिशाभूल करत होता. ती त्याच्यासोबत गेली असावी. आरोपींनी सरितावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. मातृपक्षाचा अहवाल नोंदवूनही पोलिसांनी आरोपींची अनेकवेळा चौकशी केली मात्र आरोपी खोटे बोलतच होते.

हत्येनंतर महिलेवरच प्रश्न उपस्थितआरोपी सासरच्या लोकांनी सरिताच्या हत्येनंतर तिच्या चारित्र्यावर बोट दाखविल्याचा आरोप आहे. आरोपी गावातील लोकांना ती कुणासोबत पळून गेल्याचं सांगत होते. माहेरच्यांनी याचा खुलासा करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याकडे मोबाईलचा सीडीआर वगैरे तपासण्याबाबतही बोलले. 

याप्रकरणी महिलेच्या हरवल्याची नोंद यापूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर अपहरण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आता खून आणि मृतदेह लपवून ठेवण्याच्या कलमात वाढ करण्यात येणार आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. - अशोक कुमार, एडीसीपी ग्रेटर नोएडा

टॅग्स :Policeपोलिस