शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शाब्बास पोलिसांनो! यूपीतून अपहरण करून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:07 IST

तुळींज पोलिसांनी आरोपीला केली अटक

ठळक मुद्दे१६ आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचे अपहरण करून आणलेल्या मुलींची मंगळवारी तुळींज पोलिसांनी सुटका केली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे हे १५ दिवस सुट्टीवर असतानाही त्यांना एक माहिती मिळालीदोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करून आरोपी अभिजित यादव याला अटक केले आहे.

नालासोपारा - उत्तर प्रदेशच्या सोनोली पोलीस ठाण्यांतर्गत गावातील १६ आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचे अपहरण करून आणलेल्या मुलींची मंगळवारी तुळींज पोलिसांनी सुटका केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तुळींज पोलिसांनी यूपीच्या पोलिसांशी आणि अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींच्या घरच्यांशी संपर्क साधला असून ते ताब्यात घेण्यासाठी यूपीवरून निघाले आहेत. 

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे हे १५ दिवस सुट्टीवर असतानाही त्यांना एक माहिती मिळाली की, उत्तर प्रदेशच्या सोनोली पोलीस ठाण्यात १६ आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचे अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून त्या मुली नालासोपारा पूर्वेकडील रेहमत नगरमधील अभिजित यादव याने त्याच्या घरात आणून ठेवले आहे. शिवदे यांनी नालासोपारा उपविभागीय अधिकारी दत्ता तोटेवाड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार युवराज जावळे, महिला पोलीस वनिता बरफ आणि पोलीस सावंत यांनी एका तासाच्या आत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाड मारून दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करून आरोपी अभिजित यादव याला अटक केले आहे. यात थोडा जरी उशीर झाला असता तर दोन्ही मुलींना आरोपी वाममार्गाला लावण्याची दाट शक्यता होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळेच या अल्पवयीन मुलींसोबत काही दुष्कृत्य होण्यापासून बचाव झाला आहे. 

१६ वर्षीय मुलीने नालासोपारा येथील लोकेशन आईला यूपीमध्ये कळवले होते. सदर मुलिसोबत तिच्या १७ वर्षीय मैत्रिणीचे अपहरण आरोपीने केले होते. मिरा रोड येथील मुलीच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्याने अपहरण झालेल्या मुलींची सुटका करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. - दत्ता तोटेवाड (उपविभागीय अधिकारी, नालासोपारा विभाग)

टॅग्स :KidnappingअपहरणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक