शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 03:19 IST

जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लाचखोरीला लागलेला ब्रेक अनलॉकच्या काळात फेल झाल्याने लाचखोरीने पुन्हा वेग घेतला आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली कारवाई (एसीबी) एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत चार पटीने वाढली आहे.जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.मे महिन्यात ३० कारवायांत ४३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. १ जूनपासून देशात अनलॉकचा टप्पा सुरू झाला आणि लाचखोरीलाही वेग आला. जूनमध्ये कारवाईचा आकडा ६४ वर गेला. तर जुलैमध्ये ५६ तर आॅगस्टमध्ये ४३ वर गेला. या तीन महिन्यांच्या कारवाईत २१७ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कारवाई ४७ ने कमी आहे.येथे करा तक्रारलाच स्वीकारणे जसा गुन्हा आहे, तसा देणेदेखील गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही लाच मागत असेल, त्याबाबत एसीबीच्या १०६४ या हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक