शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 03:19 IST

जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लाचखोरीला लागलेला ब्रेक अनलॉकच्या काळात फेल झाल्याने लाचखोरीने पुन्हा वेग घेतला आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली कारवाई (एसीबी) एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत चार पटीने वाढली आहे.जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.मे महिन्यात ३० कारवायांत ४३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. १ जूनपासून देशात अनलॉकचा टप्पा सुरू झाला आणि लाचखोरीलाही वेग आला. जूनमध्ये कारवाईचा आकडा ६४ वर गेला. तर जुलैमध्ये ५६ तर आॅगस्टमध्ये ४३ वर गेला. या तीन महिन्यांच्या कारवाईत २१७ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कारवाई ४७ ने कमी आहे.येथे करा तक्रारलाच स्वीकारणे जसा गुन्हा आहे, तसा देणेदेखील गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही लाच मागत असेल, त्याबाबत एसीबीच्या १०६४ या हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक