शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

एका फोन कॉलनं भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचं रहस्य उलगडलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 21:43 IST

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा आरोपीचं नाव समोर येताच अधिकारीच चक्रावले. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलास पाटील असं होतं.

इंदूर – मध्य प्रदेशातील बहुचर्चित भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर कोर्टानं तिघांना दोषी ठरवलं आहे. शुक्रवारी कोर्टानं केअरटेकर पलक पुराणिक, मुख्य सेवादार विनायक आणि शरद यांना सहा वर्षाची कोठडी सुनावली आहे. या तिघांना २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. परंतु कुठलेही ठोस पुरावे नसल्याने आरोप सिद्ध करणं मोठं आव्हान बनलं होतं. या प्रकरणातील सुरुवातीच्या तपास अधिकाऱ्यांनी हे आत्महत्या प्रकरण मानून रिपोर्ट सादर केला होता.

मात्र त्याच दरम्यान एका अज्ञात फोन कॉलनं संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूसाठी दोषी असणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश झाला. इतकचं नाही तर या फोन कॉलमुळे भैय्यू महाराजांच्या जीवनातील असं रहस्य बाहेर पडलं जे कदाचित त्यांच्या मृत्यूनंतर कधीच जगासमोर आलं नसतं. हा फोन कॉल भय्यूजी महाराजांचे वकील निवेश बडजात्या यांना आला होता. निवेश बडजात्या मागील २२ वर्षापासून महाराजांचे निकटवर्तीय होते. फोनवरुन अज्ञात व्यक्तीने ५ कोटींची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा आरोपीचं नाव समोर येताच अधिकारीच चक्रावले. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलास पाटील असं होतं. जो भैय्यू महाराजांचा चालक होता. पोलिसांच्या तपासात कैलाशनं पलक, विनायक, शरद यांच्या तिघाडीचं गुपित बाहेर आलं. त्यानंतर भय्यूजी महाराज प्रकरणी एक-एक खुलासे समोर यायला लागले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपी अलगद अडकले त्यामुळे त्यांना बचावासाठी काहीच पर्याय राहिला नाही.

कैलासनं पोलिसांना सांगितले की, पलक, विनायक आणि शरदनं भय्यूजी महाराजांच्या पैशांची हेराफेरी केली होती. भैय्यू महाराजांसह तो पलक, विनायकलाही गाडीत बसवायचा. या दोघांमधील होणाऱ्या संवादाबाबत कैलासनं पोलिसांना सांगितले. त्यावरुन तपासात धागेदोरे सापडले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनीच भैय्यू महाराजांना आत्महत्येसाठी उकसावलं होतं असं समोर आलं.

पाटीलनं या तिघांची पोलखोल केली. त्याचसोबत भय्यूजी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला. महाराज गाडीत बसून कायम मुलींशी संवाद साधायचे. त्यांचे बोलणं इंग्रजीत व्हायचे. महाराजांना वाटायचे पाटीलला इंग्रजी कळत नाही परंतु त्यांच्यासोबत राहून मला थोडीफार इंग्रजी येत होती. पाटील यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा महाराजांचे १२ मुलींसोबत संबंध असल्याचं समोर आलं. त्यातील दोन आयएएस अधिकारी होत्या. मुख्य सेवादार विनायक, शरद यांना ही कल्पना होती. याच माहितीच्या आधारे भय्यूजी महाराज यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन बनवला. त्यामुळे भय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.  

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराज