शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

एका फोन कॉलनं भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचं रहस्य उलगडलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 21:43 IST

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा आरोपीचं नाव समोर येताच अधिकारीच चक्रावले. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलास पाटील असं होतं.

इंदूर – मध्य प्रदेशातील बहुचर्चित भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर कोर्टानं तिघांना दोषी ठरवलं आहे. शुक्रवारी कोर्टानं केअरटेकर पलक पुराणिक, मुख्य सेवादार विनायक आणि शरद यांना सहा वर्षाची कोठडी सुनावली आहे. या तिघांना २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. परंतु कुठलेही ठोस पुरावे नसल्याने आरोप सिद्ध करणं मोठं आव्हान बनलं होतं. या प्रकरणातील सुरुवातीच्या तपास अधिकाऱ्यांनी हे आत्महत्या प्रकरण मानून रिपोर्ट सादर केला होता.

मात्र त्याच दरम्यान एका अज्ञात फोन कॉलनं संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. भय्यूजी महाराजांच्या मृत्यूसाठी दोषी असणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश झाला. इतकचं नाही तर या फोन कॉलमुळे भैय्यू महाराजांच्या जीवनातील असं रहस्य बाहेर पडलं जे कदाचित त्यांच्या मृत्यूनंतर कधीच जगासमोर आलं नसतं. हा फोन कॉल भय्यूजी महाराजांचे वकील निवेश बडजात्या यांना आला होता. निवेश बडजात्या मागील २२ वर्षापासून महाराजांचे निकटवर्तीय होते. फोनवरुन अज्ञात व्यक्तीने ५ कोटींची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा आरोपीचं नाव समोर येताच अधिकारीच चक्रावले. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलास पाटील असं होतं. जो भैय्यू महाराजांचा चालक होता. पोलिसांच्या तपासात कैलाशनं पलक, विनायक, शरद यांच्या तिघाडीचं गुपित बाहेर आलं. त्यानंतर भय्यूजी महाराज प्रकरणी एक-एक खुलासे समोर यायला लागले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपी अलगद अडकले त्यामुळे त्यांना बचावासाठी काहीच पर्याय राहिला नाही.

कैलासनं पोलिसांना सांगितले की, पलक, विनायक आणि शरदनं भय्यूजी महाराजांच्या पैशांची हेराफेरी केली होती. भैय्यू महाराजांसह तो पलक, विनायकलाही गाडीत बसवायचा. या दोघांमधील होणाऱ्या संवादाबाबत कैलासनं पोलिसांना सांगितले. त्यावरुन तपासात धागेदोरे सापडले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनीच भैय्यू महाराजांना आत्महत्येसाठी उकसावलं होतं असं समोर आलं.

पाटीलनं या तिघांची पोलखोल केली. त्याचसोबत भय्यूजी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत एक खुलासा केला. महाराज गाडीत बसून कायम मुलींशी संवाद साधायचे. त्यांचे बोलणं इंग्रजीत व्हायचे. महाराजांना वाटायचे पाटीलला इंग्रजी कळत नाही परंतु त्यांच्यासोबत राहून मला थोडीफार इंग्रजी येत होती. पाटील यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा महाराजांचे १२ मुलींसोबत संबंध असल्याचं समोर आलं. त्यातील दोन आयएएस अधिकारी होत्या. मुख्य सेवादार विनायक, शरद यांना ही कल्पना होती. याच माहितीच्या आधारे भय्यूजी महाराज यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन बनवला. त्यामुळे भय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.  

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराज