शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:57 IST

मुंबई पोलिसांनी या आरोपीकडून ७ मोबाईल फोन, ३ सिम कार्ड, एक एक्सटर्नल स्लॉट, ६ मेमरी कार्ड, २ डिजिटल कार्ड, ४ सिम कार्ड होल्डर जप्त केले आहेत.

मुंबई - शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर धमकीचा एक मेसेज आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथून ५१ वर्षीय अश्विनी कुमार याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ज्याने स्वत:ला दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत मुंबईला हादरवणारी धमकी दिली होती. हा आरोपी मूळचा बिहारच्या पटना येथील राहणारा आहे. मागील ५ वर्षापासून तो नोएडा येथे राहत होता. व्यवसायाने तो ज्योतिषी असल्याचे पुढे आले आहे.

मुंबई पोलिसांनी या आरोपीकडून ७ मोबाईल फोन, ३ सिम कार्ड, एक एक्सटर्नल स्लॉट, ६ मेमरी कार्ड, २ डिजिटल कार्ड, ४ सिम कार्ड होल्डर जप्त केले आहेत. या आरोपीला मुंबईत आणण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा वाहतूक पोलिसांच्या नंबरवर धमकीचा मेसेज आला होता. त्यात ३४ मानवी बॉम्ब मुंबईत लावण्यात आले असून १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा करण्यात आला. या मेसेजमध्ये लिहिलं होते की, ४०० किलो आरडीएक्सचा यासाठी वापर होणार आहे. ऐन गणेशोत्सवात सार्वजनिक गणपती विसर्जनापूर्वी हा मेसेज आल्याने मुंबई पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी शहरात अलर्ट जारी करत ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता. विसर्जनाला मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर, समुद्रकिनारी असतात. त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन काही घातपात करण्याचा कट कुणी रचतंय का अशी भीती सगळ्यांना होती. 

तपासात काय आले समोर?

पोलिसांनी तपासात अश्विनी कुमारची चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र फिरोजच्या नावाने हा मेसेज पाठवल्याचे समोर आले. या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून भांडण होते. फिरोजने पटनाच्या फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात अश्विनीकुमारविरोधात तक्रार दिली होती. ज्यामुळे अश्विनीकुमारला ३ महिने जेलमध्ये राहावे लागले. याचाच बदला घेण्यासाठी अश्विनी कुमारने फिरोजचे नाव वापरून हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नंबरवर पाठवला. मात्र तपासात पोलिसांनी अश्विनी कुमारला अटक केली. सुरुवातीच्या तपासात अश्विनी कुमारने दहशत पसरवण्यासाठी नव्हे तर मित्राचा बदला घेण्यासाठी आणि त्याला अडकवण्यासाठी हा मेसेज पाठवल्याचे कळले आहे.

काय होता मेसेज?

'लष्कर-ए-जिहादी' या दहशतवादी संघटनेचे १४ दहशतवादी मुंबईत घुसले असून ते ३४ गाड्यांमध्ये तब्बल ४०० किलो आरडीएक्स वापरून मोठा स्फोट घडवणार आहेत. या स्फोटात एक कोटी लोकांचा बळी जाण्याची शक्यता असल्याचे त्याने या संदेशात म्हटले होते. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

टॅग्स :BiharबिहारMumbai policeमुंबई पोलीसGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025Bombsस्फोटके