शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अखेरचा सेल्फी काढला, सुसाईड नोटसह मित्राला पाठवला; जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:56 IST

कर्जबाजारीपणाला वैतागून जोडप्यानं घेतला धक्कादायक निर्णय, २ मुलांना वाऱ्यावर सोडले. 

सहारनपूर -  उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं एक उद्योगपती आणि त्याची पत्नी दोघांनी गंगा नदीत उडून मारून आत्महत्या केली आहे. हे दोघेही बाईकवरून हरिद्वारला पोहचले त्याठिकाणी एक सेल्फी घेतली मग सुसाईड नोटसह दोघांचा सेल्फी मित्राला त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवला. त्यानंतर दोघांनी नदीत उडी मारली. पोलिसांनी यात पतीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवला आहे तर पत्नीचा मृतदेह अजून शोधला जात आहे.

जोडप्याने जीवन प्रवास संपवताना सुसाईड नोट लिहिली होती, त्यात दोघेही कर्जामुळे त्रस्त होते. कर्जाला वैतागून हे टोकाचं पाऊल दोघांनी उचलल्याचं समोर आले. आमची जी संपत्ती आहे ती आमच्या २ मुलांना द्या. आमच्या मुलांचा सांभाळ आजी आजोबा करतील कारण आम्हाला इतर कुणावरही विश्वास नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सराफा व्यापारी सौरभ बब्बर होता. त्याच्या पत्नीचं नाव मोना बब्बर होते. घटनेच्या दिवशी १० ऑगस्टला हे दोघे १०० किमी अंतर बाईकनं कापत हरिद्वारला पोहचले होते. त्याठिकाणी दोघांनी अखेरचा सेल्फी घेतला. त्यानंतर सुसाईड नोट आणि सेल्फी मित्राला पाठवला.

ज्या मित्राला सेल्फी आणि सुसाईड नोट पाठवली त्याने लगेच ती शेअर करत सौरभ बब्बरच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते तातडीने पोलीस ठाण्यात गेले. सौरभ आणि मोनाला शोधण्याचा प्रयत्न झाला. अथक प्रयत्नानंतर हरिद्वारच्या गंगा नहर इथं सौरभचा मृतदेह सापडला मात्र पत्नी मोना बब्बरचा मृतदेह अद्याप सापडला नाही. पोलीस तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. सौरभवर कोट्यवधीचं कर्ज होतं. व्याजामुळे तो त्रस्त झाला होता. त्यामुळे वैतागून त्याने पत्नीसोबत मिळून आत्महत्या केली. 

सौरभचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमनंतर कुटुंबाच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलीस त्याच्या पत्नीचा मृतदेह शोधत आहेत. कुटुंबाने सांगितले की, सौरभ आणि मोना यांचं १८ वर्षापूर्वी लग्न झालं होते. या दोघांना २ मुले आहेत. मोठी मुलगी १२ वर्ष आणि मुलगा ७ वर्षाचा आहे जो दिव्यांग आहे. सौरभ किशनपुरा मार्केटमध्ये ज्वेलरीचं काम करायचा. 

मृत्यूपूर्वी घरच्यांना शेवटचा कॉल

व्यवसायात होणारं नुकसान आणि कर्जाची देणी यामुळे सौरभ वैतागला होता. त्याच्याकडे पैसै नव्हते आणि कर्ज पुरवठादार सातत्याने पैशाची मागणी करत होते. या सर्व गोष्टीला कंटाळून तो पत्नीसह बाईकवरून १०० किमी दूर सहारनपूरपासून हरिद्वारला गेला तिथे या दोघांनी नदीत उडी घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सौरभचं घरच्यांसोबत शेवटचं बोलणं झाल्याचंही माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी