शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

अखेरचा सेल्फी काढला, सुसाईड नोटसह मित्राला पाठवला; जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:56 IST

कर्जबाजारीपणाला वैतागून जोडप्यानं घेतला धक्कादायक निर्णय, २ मुलांना वाऱ्यावर सोडले. 

सहारनपूर -  उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं एक उद्योगपती आणि त्याची पत्नी दोघांनी गंगा नदीत उडून मारून आत्महत्या केली आहे. हे दोघेही बाईकवरून हरिद्वारला पोहचले त्याठिकाणी एक सेल्फी घेतली मग सुसाईड नोटसह दोघांचा सेल्फी मित्राला त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवला. त्यानंतर दोघांनी नदीत उडी मारली. पोलिसांनी यात पतीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवला आहे तर पत्नीचा मृतदेह अजून शोधला जात आहे.

जोडप्याने जीवन प्रवास संपवताना सुसाईड नोट लिहिली होती, त्यात दोघेही कर्जामुळे त्रस्त होते. कर्जाला वैतागून हे टोकाचं पाऊल दोघांनी उचलल्याचं समोर आले. आमची जी संपत्ती आहे ती आमच्या २ मुलांना द्या. आमच्या मुलांचा सांभाळ आजी आजोबा करतील कारण आम्हाला इतर कुणावरही विश्वास नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सराफा व्यापारी सौरभ बब्बर होता. त्याच्या पत्नीचं नाव मोना बब्बर होते. घटनेच्या दिवशी १० ऑगस्टला हे दोघे १०० किमी अंतर बाईकनं कापत हरिद्वारला पोहचले होते. त्याठिकाणी दोघांनी अखेरचा सेल्फी घेतला. त्यानंतर सुसाईड नोट आणि सेल्फी मित्राला पाठवला.

ज्या मित्राला सेल्फी आणि सुसाईड नोट पाठवली त्याने लगेच ती शेअर करत सौरभ बब्बरच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते तातडीने पोलीस ठाण्यात गेले. सौरभ आणि मोनाला शोधण्याचा प्रयत्न झाला. अथक प्रयत्नानंतर हरिद्वारच्या गंगा नहर इथं सौरभचा मृतदेह सापडला मात्र पत्नी मोना बब्बरचा मृतदेह अद्याप सापडला नाही. पोलीस तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. सौरभवर कोट्यवधीचं कर्ज होतं. व्याजामुळे तो त्रस्त झाला होता. त्यामुळे वैतागून त्याने पत्नीसोबत मिळून आत्महत्या केली. 

सौरभचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमनंतर कुटुंबाच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलीस त्याच्या पत्नीचा मृतदेह शोधत आहेत. कुटुंबाने सांगितले की, सौरभ आणि मोना यांचं १८ वर्षापूर्वी लग्न झालं होते. या दोघांना २ मुले आहेत. मोठी मुलगी १२ वर्ष आणि मुलगा ७ वर्षाचा आहे जो दिव्यांग आहे. सौरभ किशनपुरा मार्केटमध्ये ज्वेलरीचं काम करायचा. 

मृत्यूपूर्वी घरच्यांना शेवटचा कॉल

व्यवसायात होणारं नुकसान आणि कर्जाची देणी यामुळे सौरभ वैतागला होता. त्याच्याकडे पैसै नव्हते आणि कर्ज पुरवठादार सातत्याने पैशाची मागणी करत होते. या सर्व गोष्टीला कंटाळून तो पत्नीसह बाईकवरून १०० किमी दूर सहारनपूरपासून हरिद्वारला गेला तिथे या दोघांनी नदीत उडी घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सौरभचं घरच्यांसोबत शेवटचं बोलणं झाल्याचंही माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी