शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा सेल्फी काढला, सुसाईड नोटसह मित्राला पाठवला; जोडप्यानं उचललं धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:56 IST

कर्जबाजारीपणाला वैतागून जोडप्यानं घेतला धक्कादायक निर्णय, २ मुलांना वाऱ्यावर सोडले. 

सहारनपूर -  उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं एक उद्योगपती आणि त्याची पत्नी दोघांनी गंगा नदीत उडून मारून आत्महत्या केली आहे. हे दोघेही बाईकवरून हरिद्वारला पोहचले त्याठिकाणी एक सेल्फी घेतली मग सुसाईड नोटसह दोघांचा सेल्फी मित्राला त्याच्या व्हॉट्सअपवर पाठवला. त्यानंतर दोघांनी नदीत उडी मारली. पोलिसांनी यात पतीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवला आहे तर पत्नीचा मृतदेह अजून शोधला जात आहे.

जोडप्याने जीवन प्रवास संपवताना सुसाईड नोट लिहिली होती, त्यात दोघेही कर्जामुळे त्रस्त होते. कर्जाला वैतागून हे टोकाचं पाऊल दोघांनी उचलल्याचं समोर आले. आमची जी संपत्ती आहे ती आमच्या २ मुलांना द्या. आमच्या मुलांचा सांभाळ आजी आजोबा करतील कारण आम्हाला इतर कुणावरही विश्वास नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सराफा व्यापारी सौरभ बब्बर होता. त्याच्या पत्नीचं नाव मोना बब्बर होते. घटनेच्या दिवशी १० ऑगस्टला हे दोघे १०० किमी अंतर बाईकनं कापत हरिद्वारला पोहचले होते. त्याठिकाणी दोघांनी अखेरचा सेल्फी घेतला. त्यानंतर सुसाईड नोट आणि सेल्फी मित्राला पाठवला.

ज्या मित्राला सेल्फी आणि सुसाईड नोट पाठवली त्याने लगेच ती शेअर करत सौरभ बब्बरच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते तातडीने पोलीस ठाण्यात गेले. सौरभ आणि मोनाला शोधण्याचा प्रयत्न झाला. अथक प्रयत्नानंतर हरिद्वारच्या गंगा नहर इथं सौरभचा मृतदेह सापडला मात्र पत्नी मोना बब्बरचा मृतदेह अद्याप सापडला नाही. पोलीस तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. सौरभवर कोट्यवधीचं कर्ज होतं. व्याजामुळे तो त्रस्त झाला होता. त्यामुळे वैतागून त्याने पत्नीसोबत मिळून आत्महत्या केली. 

सौरभचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमनंतर कुटुंबाच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलीस त्याच्या पत्नीचा मृतदेह शोधत आहेत. कुटुंबाने सांगितले की, सौरभ आणि मोना यांचं १८ वर्षापूर्वी लग्न झालं होते. या दोघांना २ मुले आहेत. मोठी मुलगी १२ वर्ष आणि मुलगा ७ वर्षाचा आहे जो दिव्यांग आहे. सौरभ किशनपुरा मार्केटमध्ये ज्वेलरीचं काम करायचा. 

मृत्यूपूर्वी घरच्यांना शेवटचा कॉल

व्यवसायात होणारं नुकसान आणि कर्जाची देणी यामुळे सौरभ वैतागला होता. त्याच्याकडे पैसै नव्हते आणि कर्ज पुरवठादार सातत्याने पैशाची मागणी करत होते. या सर्व गोष्टीला कंटाळून तो पत्नीसह बाईकवरून १०० किमी दूर सहारनपूरपासून हरिद्वारला गेला तिथे या दोघांनी नदीत उडी घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सौरभचं घरच्यांसोबत शेवटचं बोलणं झाल्याचंही माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी