शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला मारून टाकू नाहीतर...; जाचाला कंटाळून अखेर प्रेमीयुगुलानं आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:42 IST

या घटनेत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

नाशिक - नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे काही ग्रामस्थांच्या जाचाला कंटाळून प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मयत महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर नांदगाव पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या तीन महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी पाच जणांना या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.

या घटनेतील महिला आशा कर्मचारी असून तिचे गावातील युवकाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला गावातीलच काही मंडळींचा विरोध होता. तिने प्रियकराशी संबंध तोडून टाकावे यासाठी गावातील काही मंडळींचा प्रयत्न सुरू होता. जर प्रेमसंबंध तोडले नाही तर जगू देणार नाही, आत्महत्या करा अशा धमक्या दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून या प्रेमीयुगुलाने तालुक्यातील नस्तनपूरजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली रात्री स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली आहे.

या घटनेत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. मयत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो व्हॉट्सअप केला, त्यानंतर आत्महत्या केली. ज्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली तिच्या चालकाने हा प्रकार स्टेशन मास्टरला कळवला. 

दरम्यान, प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत अरूण गायकवाड, संदीप सावंत, प्रकाश सावंत, नवनाथ जाधव, संतोष पवार, अनिल दखने, संजय सोनावणे, रोहिदास सोनावणे, सोपान गुंडगळ, सुनिता पवार, सोनल पवार, जन्याबाई गुंडगळ, नितीन घाडगे, सतीश जाधव, बाळू गोसावी, छगन साठे यांनी वेळोवेळी आम्हाला धमकी देऊन आम्ही तुम्हाला मारून टाकू नाहीतर तुम्ही आत्महत्या करा अशी धमकी दिल्याने मी आणि माझा प्रियकर आत्महत्या करत आहोत असं चिठ्ठीत म्हटलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी