शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तुम्हाला मारून टाकू नाहीतर...; जाचाला कंटाळून अखेर प्रेमीयुगुलानं आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:42 IST

या घटनेत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

नाशिक - नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे काही ग्रामस्थांच्या जाचाला कंटाळून प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मयत महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर नांदगाव पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या तीन महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी पाच जणांना या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.

या घटनेतील महिला आशा कर्मचारी असून तिचे गावातील युवकाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला गावातीलच काही मंडळींचा विरोध होता. तिने प्रियकराशी संबंध तोडून टाकावे यासाठी गावातील काही मंडळींचा प्रयत्न सुरू होता. जर प्रेमसंबंध तोडले नाही तर जगू देणार नाही, आत्महत्या करा अशा धमक्या दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून या प्रेमीयुगुलाने तालुक्यातील नस्तनपूरजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली रात्री स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली आहे.

या घटनेत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. मयत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो व्हॉट्सअप केला, त्यानंतर आत्महत्या केली. ज्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली तिच्या चालकाने हा प्रकार स्टेशन मास्टरला कळवला. 

दरम्यान, प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत अरूण गायकवाड, संदीप सावंत, प्रकाश सावंत, नवनाथ जाधव, संतोष पवार, अनिल दखने, संजय सोनावणे, रोहिदास सोनावणे, सोपान गुंडगळ, सुनिता पवार, सोनल पवार, जन्याबाई गुंडगळ, नितीन घाडगे, सतीश जाधव, बाळू गोसावी, छगन साठे यांनी वेळोवेळी आम्हाला धमकी देऊन आम्ही तुम्हाला मारून टाकू नाहीतर तुम्ही आत्महत्या करा अशी धमकी दिल्याने मी आणि माझा प्रियकर आत्महत्या करत आहोत असं चिठ्ठीत म्हटलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी