शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अजूनही ९५ एसपी, अप्पर अधीक्षकांच्या बदल्यांचा गुंता कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:40 IST

बदल्यांबाबत राज्य सरकार व पोलीस महासंचालक यांच्यात अद्याप एकवाक्यता झालेली नाही. हा गुंता दोन दिवसांत मार्गी लागल्यास बदल्या होतील, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :    जिल्हा पोलीस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर अधीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्याचे घोंगडें भिजत राहिले आहे. बदल्यांच्या मुदतीला अवघे ५ दिवस उरले असताना गृह विभागाकडून त्याबाबत अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे राज्यातील   ९५ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे १४० अधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.

बदल्यांबाबत राज्य सरकार व पोलीस महासंचालक यांच्यात  अद्याप एकवाक्यता झालेली नाही. हा गुंता दोन दिवसांत मार्गी लागल्यास बदल्या होतील,  असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. सोमवारी ३८ अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले.                सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएस केडरचे ३४ अधीक्षक, उपायुक्त बदलीसाठी पात्र आहेत. एक जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत तर ४ जणांनी बदलीसाठी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे ५६ असंवर्ग (नॉन केडरचे) अप्पर अधीक्षक, उपायुक्तांचा सध्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या ९५ जणांपैकी काहींना आहे त्या ठिकाणी मुदतवाढ हवी आहे, पण पांडे त्यासाठी राजी नाहीत.

टॅग्स :Policeपोलिस