शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

लाच घेण्यात पोलीस विभागचं अव्वल, कोरोना काळातही सव्वा महिन्यात 92 एसीबी ट्रॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 22:58 IST

१२६ आरोपींचा समावेश : अपसंपदा अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद नाही

ठळक मुद्देराज्यात सव्वा महिन्यात ९२ ट्रॅप झाले यात लाच खाण्यात पोलीस विभागाच अव्वल असून, यामध्ये १९ ट्रॅप यशस्वी झाले.

संदीप मानकर

अमरावती - लॉकडाऊनमध्ये एसीबी ट्रॅपमध्ये घट झाली होती. पण, अनलॉकमध्ये पुन्हा शासकीय कार्यालयाचे कामकाज पूर्ववत झाल्यामुळे कोरोनाकाळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. राज्यात ४२ दिवसांत ९२ एसीबी सापळे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे दरदिवशी दोन किंवा तीन सापळे यशस्वी होत आहेत.

९२ ट्रॅपमध्ये १२६ आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, ९२ ट्रॅपमध्ये एकही अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही, हे विशेष!

या विभागात झाले ट्रॅप

सव्वा महिन्यात सर्वाधिक ट्रॅप हे राज्यात पुणे विभागात झाले. या विभागात २३ ट्रॅपमध्ये २९ आरोपींना अटक करण्यात आली.

मुंबईत २, ठाण्यात ७, पुण्यात २३, नाशिक येथे १७, नागपूर येथे १२, अमरावती येथे १०, औरंगाबाद येथे १५, नांदेड येथे ६ ट्रॅप यशस्वी झाले.

पाच वर्षांत साडेचार हजार ट्रॅपप्रकरणे वर्ष २०१६ ,२०१७, २०१८, २०१९, २०२०

सापळा         - ९८५, ८७५, ८९१, ८६६, ६३०अपसंदपदा - १७, २२, २२, २०, १२

अन्य भ्रष्टाचार १४, २८, २३, ५, २१एकूण गुन्हे १०२६, ९२५, ९३६, ८९१, ६६३

लाच घेण्यात पोलीस विभाग अव्वलराज्यात सव्वा महिन्यात ९२ ट्रॅप झाले यात लाच खाण्यात पोलीस विभागाच अव्वल असून, यामध्ये १९ ट्रॅप यशस्वी झाले. दुसरा क्रमांक हा महसूल विभागाचा असून, १६ ट्रॅप यशस्वी झाले. महावितरणमध्ये १४ ट्रॅप, तर महानगरपालिका ६, पंचायत समिती ७ ट्रॅप यशस्वी झाले. ९२ ट्रॅपममध्ये १ कोटी ८४ लाख ६२ हजारांची रक्कम आरोपीकडून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जप्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस