शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सूरज चव्हाणची ८८ लाखांची मालमत्ता जप्त; 'ईडी'ने केली कारवाई, मुंबईतील फ्लॅटचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 05:45 IST

जप्त केलेल्या मालमत्तेत रत्नागिरी जिल्ह्यातील भूखंडाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोविड काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या सूरज चव्हाण याची ८८ लाख रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने शनिवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील फ्लॅट व रत्नागिरी जिल्ह्यातील भूखंडाचा समावेश आहे.

कोविडकाळात महापालिकेतर्फे खिचडी वाटपाचे कंत्राट फोर्स वन मल्टिसर्व्हिसेस या कंपनीला प्राप्त झाले. हे काम संबंधित कंपनीला प्राप्त करून देण्यामध्ये सूरजचा मोठा वाटा होता. कंपनीला हे कंत्राट मिळवून देताना निर्धारित निकषांचे उल्लंघन झाल्याचाही ठपका  आहे. याप्रकरणी सूरजला १ कोटी ३५ लाख रुपये मिळाल्याचा आरोप आहे.

प्रकरण काय?

या खिचडी प्रकरणातील कंत्राटाच्या अटीनुसार १५ एप्रिल २०२० पासून संबंधित कंपनीने ३०० ग्रॅम वजनाचे खिचडीचे पाकीट वितरित करणे अपेक्षित होते. याकरिता प्रति पॅकेट ३३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. या प्रकरणात सूरज चव्हाण याला मिळालेल्या पैशांतून त्यांनी फ्लॅट व भूखंडाची खरेदी केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला असून, त्यामुळेच ही जप्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तसेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने देखील या प्रकरणाचा तपास केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या याच गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ या प्रकरणाचा तपास करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय