शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

थरारक! प्रेम संबंधातून ५ जणांची हत्या; शेतात १० फूट खड्ड्यात मृतदेह पुरले, पोलिसांनी JCB आणला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 17:17 IST

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात असलेल्या नेमावर येथे एका शेतात पोलिसांना २९ जूनच्या संध्याकाळी ५ जणांचे मृतदेह सापडले.

ठळक मुद्देपोलीस या बेपत्ता लोकांचा शोध घेत होती. बेपत्ता झालेल्यांमध्ये १ महिला, ३ युवती आणि एका युवकाचा समावेश होता. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं १० फूट खड्डा खणत हे सगळे मृतदेह बाहेर काढले.हे क्रूर हत्याकांड सुरेंद्र आणि रुपाली या दोघांच्या प्रेम प्रकरणातून झालं आहे.

देवास – मध्य प्रदेशातील देवास येथे ५ जणांची निघृण हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र आणि त्याचा सहकारी करण या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर आरोपी राकेश निमोरे याला ताब्यात घेतलं आहे. सुरेंद्रचा भाऊ विरेंद्रला यालाही पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. आतापर्यंत या हत्याकांडात ७ जणांना अटक केली असून पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात असलेल्या नेमावर येथे एका शेतात पोलिसांना २९ जूनच्या संध्याकाळी ५ जणांचे मृतदेह सापडले. हे सर्वजण १३ मेपासून बेपत्ता होते. माहितीनुसार, पोलीस या बेपत्ता लोकांचा शोध घेत होती. बेपत्ता झालेल्यांमध्ये १ महिला, ३ युवती आणि एका युवकाचा समावेश होता. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने शोध घेत आहेत. तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक-एक आरोपींना बेड्या ठोकत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र राजपूत याच्या शेतात खड्डा खोदल्यानंतर ५ मृतदेह पोलिसांनी जप्त केले.

पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं १० फूट खड्डा खणत हे सगळे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ आयजी योगेश देशमुख नेमावर येथे पोहचले. योगेश देशमुख यांनी माध्यमांना सांगितले की, हे क्रूर हत्याकांड सुरेंद्र आणि रुपाली या दोघांच्या प्रेम प्रकरणातून झालं आहे. सुरेंद्रचं मृत युवती रुपालीसोबत प्रेम संबंध होते. मात्र सुरेंद्रचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरलं होतं. प्रेयसी रुपालीसोबत सुरेंद्रला कंटाळा आला होता. रुपालीने सुरेंद्रच्या होणाऱ्या बायकोचा फोटो सोशल मीडियात व्हायरल केला होता. सुरेंद्रचं लग्न होऊ नये यासाठी रुपाली प्रयत्नशील होती. त्याच कारणाने सुरेंद्रने तिचा काटा काढण्याचं ठरवलं आणि सहकाऱ्यांसोबत त्याने क्रूर हत्याकांड घडवलं असं पोलीस म्हणाले.

मृतांमध्ये ममता(४५), रुपाली(२१), दिव्या(१४), पूजा(१५) पवन(१४) यांचा समावेश आहे. हे सर्व आदिवासी भागातून येत असून नेमावर येथे भाड्याने रुम घेऊन राहत होते. आरोपीने या सगळ्यांची हत्या करून मृतदेहाची लवकर विल्हेवाट लावावी यासाठी खड्ड्यात मीठ आणि खतही टाकलं होतं. युवती रुपाली, दिव्या आणि पूजा यांचा मृतदेह निर्वस्त्र सापडला त्यामुळे या तिघींसोबत बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमावर पोलिसांनी या हत्येशी निगडीत मुख्य आरोपी सुरेंद्र राजपूतसह ७ जणांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी राकेश रुपालीचा मोबाईल वापरत असल्याचं समोर आलं. रुपाली मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. याच मोबाईलमधून सुरेंद्र आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो व्हायरल झाला होता. याच मोबाईलचा वापर करून राकेशनं रुपाली असल्याचा बनाव करून पवन आणि पूजाला मेसेज केला होता. मी रोहित नावाच्या मुलाशी लग्न केले आहे. आमची चिंता करू नका, आम्ही जिथे कुठे आहोत सुरक्षित आहोत.

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश