शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

थरारक! प्रेम संबंधातून ५ जणांची हत्या; शेतात १० फूट खड्ड्यात मृतदेह पुरले, पोलिसांनी JCB आणला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 17:17 IST

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात असलेल्या नेमावर येथे एका शेतात पोलिसांना २९ जूनच्या संध्याकाळी ५ जणांचे मृतदेह सापडले.

ठळक मुद्देपोलीस या बेपत्ता लोकांचा शोध घेत होती. बेपत्ता झालेल्यांमध्ये १ महिला, ३ युवती आणि एका युवकाचा समावेश होता. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं १० फूट खड्डा खणत हे सगळे मृतदेह बाहेर काढले.हे क्रूर हत्याकांड सुरेंद्र आणि रुपाली या दोघांच्या प्रेम प्रकरणातून झालं आहे.

देवास – मध्य प्रदेशातील देवास येथे ५ जणांची निघृण हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र आणि त्याचा सहकारी करण या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर आरोपी राकेश निमोरे याला ताब्यात घेतलं आहे. सुरेंद्रचा भाऊ विरेंद्रला यालाही पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. आतापर्यंत या हत्याकांडात ७ जणांना अटक केली असून पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात असलेल्या नेमावर येथे एका शेतात पोलिसांना २९ जूनच्या संध्याकाळी ५ जणांचे मृतदेह सापडले. हे सर्वजण १३ मेपासून बेपत्ता होते. माहितीनुसार, पोलीस या बेपत्ता लोकांचा शोध घेत होती. बेपत्ता झालेल्यांमध्ये १ महिला, ३ युवती आणि एका युवकाचा समावेश होता. पोलीस या प्रकरणाचा बारकाईने शोध घेत आहेत. तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक-एक आरोपींना बेड्या ठोकत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र राजपूत याच्या शेतात खड्डा खोदल्यानंतर ५ मृतदेह पोलिसांनी जप्त केले.

पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं १० फूट खड्डा खणत हे सगळे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ आयजी योगेश देशमुख नेमावर येथे पोहचले. योगेश देशमुख यांनी माध्यमांना सांगितले की, हे क्रूर हत्याकांड सुरेंद्र आणि रुपाली या दोघांच्या प्रेम प्रकरणातून झालं आहे. सुरेंद्रचं मृत युवती रुपालीसोबत प्रेम संबंध होते. मात्र सुरेंद्रचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरलं होतं. प्रेयसी रुपालीसोबत सुरेंद्रला कंटाळा आला होता. रुपालीने सुरेंद्रच्या होणाऱ्या बायकोचा फोटो सोशल मीडियात व्हायरल केला होता. सुरेंद्रचं लग्न होऊ नये यासाठी रुपाली प्रयत्नशील होती. त्याच कारणाने सुरेंद्रने तिचा काटा काढण्याचं ठरवलं आणि सहकाऱ्यांसोबत त्याने क्रूर हत्याकांड घडवलं असं पोलीस म्हणाले.

मृतांमध्ये ममता(४५), रुपाली(२१), दिव्या(१४), पूजा(१५) पवन(१४) यांचा समावेश आहे. हे सर्व आदिवासी भागातून येत असून नेमावर येथे भाड्याने रुम घेऊन राहत होते. आरोपीने या सगळ्यांची हत्या करून मृतदेहाची लवकर विल्हेवाट लावावी यासाठी खड्ड्यात मीठ आणि खतही टाकलं होतं. युवती रुपाली, दिव्या आणि पूजा यांचा मृतदेह निर्वस्त्र सापडला त्यामुळे या तिघींसोबत बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमावर पोलिसांनी या हत्येशी निगडीत मुख्य आरोपी सुरेंद्र राजपूतसह ७ जणांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी राकेश रुपालीचा मोबाईल वापरत असल्याचं समोर आलं. रुपाली मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. याच मोबाईलमधून सुरेंद्र आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो व्हायरल झाला होता. याच मोबाईलचा वापर करून राकेशनं रुपाली असल्याचा बनाव करून पवन आणि पूजाला मेसेज केला होता. मी रोहित नावाच्या मुलाशी लग्न केले आहे. आमची चिंता करू नका, आम्ही जिथे कुठे आहोत सुरक्षित आहोत.

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश