शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता, परिसरात खळबळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 20:18 IST

नवी मुंबई – नवी मुंबईतल्या आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. कातकरी पाडा, भीमनगर, रबाळे एमआयडीसी येथील आदिवासी पाड्यातील ५ मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. शंकर तेजवंत सिंह (वय ११), गगन तेजवंत सिंह (वय ८), अर्जुन श्रीधर ढमढेरे (वय ११), रोहित राजकुमार जयस्वाल (वय १३), ...

नवी मुंबई – नवी मुंबईतल्या आदिवासी पाड्यातील ५ मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. कातकरी पाडा, भीमनगर, रबाळे एमआयडीसी येथील आदिवासी पाड्यातील ५ मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. शंकर तेजवंत सिंह (वय ११), गगन तेजवंत सिंह (वय ८), अर्जुन श्रीधर ढमढेरे (वय ११), रोहित राजकुमार जयस्वाल (वय १३), अनिश कृष्णकुमार अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.

काल दुपारी रबाळेमधील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील हे 5 विद्यार्थी शाळेजवळ खेळत होती. दुपारी 1 वाजता अचानक ही मुलं दिसेनाशी झाली. त्यानंतर त्यांचा आदिवासी पाड्यातील सगळ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ही मुलं कुठेही सापडली नाही. या मुलांना बेपत्ता होऊन आता अनेक तास उलटून गेले आहेत. रात्रभर वस्तीतील लोकांनी या मुलांना शोध घेतला. परंतु त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आता पोलिसांची पथके या मुलांना शोधण्यासाठी कामाला लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण