शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

४ जणांच्या हत्येने जोधपूर हादरलं; गुन्हेगारांनी ६ महिन्याच्या बाळालाही ठार केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:33 IST

आगीचा धूर पाहता गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर चौघांचे मृतदेह पाहून हे हत्याकांड समोर आले.

जोधपूर – राजस्थानच्या जोधपूर परिसरात बुधवारी सकाळी खळबळजनक हत्याकांड समोर आले. ओसिया तालुक्यातील रामनगर गावात एकाच कुटुंबातील ४ लोकांची निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेत ६ महिन्याच्या चिमुरडीलाही गुन्हेगारांनी सोडले नाही. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, त्याची पत्नी, सून आणि नाती यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. इतक्यावर गुन्हेगार थांबले नाही तर त्यांनी सर्व मृतदेह एका खोलीत ठेवून त्याला आग लावली.

प्राथमिक तपासानुसार, गुन्हेगारांनी घराबाहेर झोपलेल्या दाम्पत्याचा गळा चिरला. त्यानंतर झोपडीत जाऊन सून आणि नातीलाही मारून टाकले. रामनगरच्या पुनाराम यांच्या घरी हे हत्याकांड घडले. ६० वर्षीय पुनाराम आणि त्यांची ५५ वर्षीय पत्नी भंवरी देवी दोघेही घराबाहेर खाटीवर झोपले होते. त्यांची सून धापू आणि ६ महिन्याची नात मनिषा झोपडीत झोपले होते. भल्या पहाटे कुणीतरी घराबाहेर झोपलेल्या दाम्पत्याची हत्या केली. त्यानंतर झोपडीत असणाऱ्या सून-नातीला संपवले. त्यानंतर सर्व मृतदेह झोपडीत टाकून त्याला आग लावली. आगीचा धूर पाहता गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर चौघांचे मृतदेह पाहून हे हत्याकांड समोर आले.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. ४ जणांच्या हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली. जोधपूर जिल्हाधिकारी हिमांशु गुप्ता, ग्रामीण एसपी धर्मेंद सिंह यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पुनारामला दोन मुले आहेत. हत्याकांडावेळी दोघेही घरात नव्हते. एक शेतावर काम करण्यासाठी गेला होता तर दुसरा मुलगा अन्य गावात गेला होता. सध्या पोलिसांनी संशयाच्या आधारे जवळच्यांची चौकशी करत आहे. लवकरच या हत्याकांडातील आरोपींचा शोध घेतला जाईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी