शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

फसवणूक करून चोरलेली ३१ वाहने केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:15 IST

गाड्या भाड्याने लावून महिना चांगले उत्पन्न मिळवायचे आमिष दाखवून वाहनचोरी करणाऱ्या दोघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ कोटी १० लाख रुपये किमतीची ३१ वाहने जप्त केली.

नवी मुंबई : गाड्या भाड्याने लावून महिना चांगले उत्पन्न मिळवायचे आमिष दाखवून वाहनचोरी करणाऱ्या दोघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ कोटी १० लाख रुपये किमतीची ३१ वाहने जप्त केली.कंपन्या अथवा कार्यालयांमध्ये गाड्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार घडत होते. ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा अपहार करून संबंधितांची फसवणूक केली जात होती. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अशा गुन्ह्यांच्या अनुषंगाने उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांनी निरीक्षक सुनील गवळी, सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, सचिन मोरे आदींचे पथक तयार केले होते. या पथकाने दोघांची माहिती मिळवून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत नवी मुंबईतील पाच गुन्हे उघडकीस आले. यानुसार छोटेलाल उर्फ राजेश शर्मा (५४) व हरिदास शिलोत्रे उर्फ पाटील (४०) यांना अटक केली. शर्मा पनवेलचा, तर शिलोत्रे भिवंडीचा राहणारा आहे. त्यांनी फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या गाड्या इतर ठिकाणी गहाण ठेवून त्याबदल्यात पैसे घेतले होते. अशा ३१ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून, त्यांची किंमत २ कोटी १० लाख रुपये आहे. उघडकीस आलेल्या गुन्ह्यात नेरूळ, न्हावाशेवा, मानखुर्द, खारघर तसेच वाशी व इतर ठिकाणच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी या जप्त केलेल्या वाहनांची सोमवारी पाहणी केली. तसेच तपास पथकाच्या कार्याचेही कौतुक केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी