शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

२५ वर्षांनी फरार आरोपी इस्राइलहून आला मुंबई; दुचाकीच्या नंबरवरून पुन्हा केली तुरुंगात रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 13:18 IST

पोलिसांना याची माहिती समजली. मात्र, पोलिसांकडे फक्त त्याच्या दुचाकीचा नंबर होता. या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले असून त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे. ऑगस्टिन जोसेफ असे या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देऑगस्टिन जोसेफ (वय ५१) हा १९९२ मधील हत्या प्रकरणातील आरोपी आहे १९९२ मध्ये पैशांच्या वादातून ही हत्या झाली होतीसत्र न्यायालयानेही पोलिसांना जोसेफचा शोध घेण्याचे आदेश दिले होते

मुंबई - हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यावर इस्राइलला पलायन केलेला आरोपी २५ वर्षांनी मुंबईत परतला. पोलिसांना याची माहिती समजली. मात्र, पोलिसांकडे फक्त त्याच्या दुचाकीचा नंबर होता. या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. ऑगस्टिन जोसेफ असं या आरोपीचं नाव आहे.

ऑगस्टिन जोसेफ (वय ५१) हा १९९२ मधील हत्या प्रकरणातील आरोपी आहे. जोसेफ आणि त्याच्या पाच मित्रांनी शिवडीमधील अंजूमन इस्लाम या तरुणाची हत्या केली होती. १९९२ मध्ये पैशांच्या वादातून ही हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. १९९३ साली जोसेफला या प्रकरणात जामीन मिळाला. १९९४ मध्ये जोसेफ इस्राइलला फरार झाला. जोसेफ आणि त्याची पत्नी इस्राइलला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो अधूनमधून भारतात येत असल्याचेही पोलिसांना समजले होते. मात्र, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता.

सत्र न्यायालयानेही पोलिसांना जोसेफचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ९ चे पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाला जोसेफ डिसेंबर २०१७ मध्येच भारतात परतल्याची माहिती मिळाली होती. तो मुंबईतील वांद्रे येथील नवीन घरात राहत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याच्याकडे दुचाकी असल्याचेही समोर आले होते. पोलिसांनी याच दुचाकीच्या आधारे आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक हरीश बनसोडे आणि पोलीस हवालदार प्रकाश वारंग यांना जोसेफची दुचाकी वांद्रे पश्चिम परिसरात दिसल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस पथकाने जोसेफला अटक केली. चौकशीदरम्यान जोसेफनेही गुन्ह्याची कबुली दिली असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMurderखून