शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नाशिक परिक्षेत्रातून २२० गुन्हेगारांना पिटाळले; ४३ गुंडांना कारागृहात डांबले

By अझहर शेख | Updated: April 24, 2024 15:07 IST

नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत विविध सुचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. कायदा व सुव्यवस्था नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत टिकून रहावी, सर्वत्र निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतून सुमारे २२० गुन्हेगारांना तडीपार करत पिटाळून लावले आहे. तर ४३ गुंडांना ‘एमपीडीए’अंतर्गत कारागृहात डांबण्यात आले आहे.

नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत विविध सुचना देण्यात आल्या आहेत. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी तडीपार, स्थानबद्धतेचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच आपापल्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांविरूद्धही कारवाई करण्याबाबतचा आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहे. लोकसभेचे मतदान पार पडेपर्यंत पाचही जिल्ह्यांत चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. 

प्रत्येक जिल्ह्यात भेटी देऊन कायदा व सुव्यवस्था आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी दिली. नाशिक परिक्षेत्रातून एकुण २१ हजार ८६१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत बंधपत्र लिहून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जे संघटितपणे गुन्हेगारीत सक्रीय होते, अशा सराईत गुन्हेगारांच्या तीन टोळ्यांवर आतापर्यंत ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

सोशल मीडियावर विशेष लक्षसोशल मीडियावर राजकिय, धार्मिक, सामाजिक किंंवा वैयक्तिक पातळीवर कुठल्याहीप्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकून भावना दुखविण्याचा किंवा जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करताना आढळल्यास त्यास तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेेत. तसेच रेकॉर्डवरील उपद्रवी इसम, दंगल भडकविणारे समाजकंटक, शरिराविरूद्ध, मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे यांचे वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :jailतुरुंगNashikनाशिक