शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिक परिक्षेत्रातून २२० गुन्हेगारांना पिटाळले; ४३ गुंडांना कारागृहात डांबले

By अझहर शेख | Updated: April 24, 2024 15:07 IST

नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत विविध सुचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. कायदा व सुव्यवस्था नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत टिकून रहावी, सर्वत्र निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतून सुमारे २२० गुन्हेगारांना तडीपार करत पिटाळून लावले आहे. तर ४३ गुंडांना ‘एमपीडीए’अंतर्गत कारागृहात डांबण्यात आले आहे.

नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत विविध सुचना देण्यात आल्या आहेत. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी तडीपार, स्थानबद्धतेचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच आपापल्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांविरूद्धही कारवाई करण्याबाबतचा आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहे. लोकसभेचे मतदान पार पडेपर्यंत पाचही जिल्ह्यांत चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. 

प्रत्येक जिल्ह्यात भेटी देऊन कायदा व सुव्यवस्था आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी दिली. नाशिक परिक्षेत्रातून एकुण २१ हजार ८६१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत बंधपत्र लिहून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जे संघटितपणे गुन्हेगारीत सक्रीय होते, अशा सराईत गुन्हेगारांच्या तीन टोळ्यांवर आतापर्यंत ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

सोशल मीडियावर विशेष लक्षसोशल मीडियावर राजकिय, धार्मिक, सामाजिक किंंवा वैयक्तिक पातळीवर कुठल्याहीप्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकून भावना दुखविण्याचा किंवा जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करताना आढळल्यास त्यास तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेेत. तसेच रेकॉर्डवरील उपद्रवी इसम, दंगल भडकविणारे समाजकंटक, शरिराविरूद्ध, मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे यांचे वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :jailतुरुंगNashikनाशिक