शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

वेगवान दुचाकीच्या दुर्घटनेत २ युवकांनी रस्त्यावर तडफडून जीव सोडला; कुटुंबीयांना धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:40 IST

तलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबोली रहिवासी २२ वर्षीय नितीन आणि २० वर्षीय आशिष नौटियाल दुचाकीवरुन क्लासला जात होते.

सहारनपूर – देवबंदमधील सहारनपूर – मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गुरुवारी साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या डंपरला धडकली. या दुर्घटनेत दुचाकीवर स्वार असलेल्या २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. सूचना मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. मात्र या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबोली रहिवासी २२ वर्षीय नितीन आणि २० वर्षीय आशिष नौटियाल दुचाकीवरुन क्लासला जात होते. गुरुवारी दुपारी जवळपास २.३० च्या सुमारास सहारनपूर-मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गावात साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी नियंत्रण सुटलं. त्यानंतर दुचाकी रस्त्याकिनारी उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागे धडकली. दोन्ही युवकांनी हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले.

युवकाच्या मृत्यूची बातमी अंबोली गावात पोहचली तेव्हा कुटुंबीयासह गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी मृत युवकांच्या घराबाहेर गर्दी केली. दुर्घटनेत डंपर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अधिकारी रजनीश उपाध्याय म्हणाले की, मृत युवकांच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. ही दुर्घटना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घडली. युवक विना हेल्मेट दुचाकी चालवत होते. जर दोघांनी हेल्मेट घातलं असतं तर कदाचित त्यांचा जीव बचावला असता.

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना घरातील वंशाचे दोन दिवे अशाप्रकारे विझतील याची कल्पनाही कुणी केली नाही. विद्यार्थी नितीन आणि आशिष यांच्या दिर्घ आयुष्यासाठी आईंनी व्रत ठेवला होता. मात्र घरी दोघांच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

१ तास रुग्णवाहिका आलीच नाही

राज्य महामार्गावर गुरुवारी ही दुर्घटना घडली ज्यात अपघातानंतर दोन्ही युवक घटनास्थळावर तडफडत होते. त्यावेळी हायवेवरुन जाणाऱ्या लोकांनी तात्काळ १०८ नंबरवर फोन करुन रुग्णवाहिका बोलावली. जवळपास १ तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. तोपर्यंत युवकांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. जर जखमी युवकांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश