शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वेगवान दुचाकीच्या दुर्घटनेत २ युवकांनी रस्त्यावर तडफडून जीव सोडला; कुटुंबीयांना धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:40 IST

तलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबोली रहिवासी २२ वर्षीय नितीन आणि २० वर्षीय आशिष नौटियाल दुचाकीवरुन क्लासला जात होते.

सहारनपूर – देवबंदमधील सहारनपूर – मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गुरुवारी साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या डंपरला धडकली. या दुर्घटनेत दुचाकीवर स्वार असलेल्या २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. सूचना मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. मात्र या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबोली रहिवासी २२ वर्षीय नितीन आणि २० वर्षीय आशिष नौटियाल दुचाकीवरुन क्लासला जात होते. गुरुवारी दुपारी जवळपास २.३० च्या सुमारास सहारनपूर-मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गावात साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी नियंत्रण सुटलं. त्यानंतर दुचाकी रस्त्याकिनारी उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागे धडकली. दोन्ही युवकांनी हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले.

युवकाच्या मृत्यूची बातमी अंबोली गावात पोहचली तेव्हा कुटुंबीयासह गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी मृत युवकांच्या घराबाहेर गर्दी केली. दुर्घटनेत डंपर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अधिकारी रजनीश उपाध्याय म्हणाले की, मृत युवकांच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. ही दुर्घटना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घडली. युवक विना हेल्मेट दुचाकी चालवत होते. जर दोघांनी हेल्मेट घातलं असतं तर कदाचित त्यांचा जीव बचावला असता.

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना घरातील वंशाचे दोन दिवे अशाप्रकारे विझतील याची कल्पनाही कुणी केली नाही. विद्यार्थी नितीन आणि आशिष यांच्या दिर्घ आयुष्यासाठी आईंनी व्रत ठेवला होता. मात्र घरी दोघांच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

१ तास रुग्णवाहिका आलीच नाही

राज्य महामार्गावर गुरुवारी ही दुर्घटना घडली ज्यात अपघातानंतर दोन्ही युवक घटनास्थळावर तडफडत होते. त्यावेळी हायवेवरुन जाणाऱ्या लोकांनी तात्काळ १०८ नंबरवर फोन करुन रुग्णवाहिका बोलावली. जवळपास १ तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. तोपर्यंत युवकांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. जर जखमी युवकांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश