शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वेगवान दुचाकीच्या दुर्घटनेत २ युवकांनी रस्त्यावर तडफडून जीव सोडला; कुटुंबीयांना धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:40 IST

तलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबोली रहिवासी २२ वर्षीय नितीन आणि २० वर्षीय आशिष नौटियाल दुचाकीवरुन क्लासला जात होते.

सहारनपूर – देवबंदमधील सहारनपूर – मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गुरुवारी साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या डंपरला धडकली. या दुर्घटनेत दुचाकीवर स्वार असलेल्या २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. सूचना मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. मात्र या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तलहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबोली रहिवासी २२ वर्षीय नितीन आणि २० वर्षीय आशिष नौटियाल दुचाकीवरुन क्लासला जात होते. गुरुवारी दुपारी जवळपास २.३० च्या सुमारास सहारनपूर-मुजफ्फरनगर राज्य महामार्गावर गावात साखन कालव्याजवळ वेगवान दुचाकी नियंत्रण सुटलं. त्यानंतर दुचाकी रस्त्याकिनारी उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागे धडकली. दोन्ही युवकांनी हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले.

युवकाच्या मृत्यूची बातमी अंबोली गावात पोहचली तेव्हा कुटुंबीयासह गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी मृत युवकांच्या घराबाहेर गर्दी केली. दुर्घटनेत डंपर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अधिकारी रजनीश उपाध्याय म्हणाले की, मृत युवकांच्या कुटुंबीयांकडून कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. ही दुर्घटना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घडली. युवक विना हेल्मेट दुचाकी चालवत होते. जर दोघांनी हेल्मेट घातलं असतं तर कदाचित त्यांचा जीव बचावला असता.

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना घरातील वंशाचे दोन दिवे अशाप्रकारे विझतील याची कल्पनाही कुणी केली नाही. विद्यार्थी नितीन आणि आशिष यांच्या दिर्घ आयुष्यासाठी आईंनी व्रत ठेवला होता. मात्र घरी दोघांच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

१ तास रुग्णवाहिका आलीच नाही

राज्य महामार्गावर गुरुवारी ही दुर्घटना घडली ज्यात अपघातानंतर दोन्ही युवक घटनास्थळावर तडफडत होते. त्यावेळी हायवेवरुन जाणाऱ्या लोकांनी तात्काळ १०८ नंबरवर फोन करुन रुग्णवाहिका बोलावली. जवळपास १ तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. तोपर्यंत युवकांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. जर जखमी युवकांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश