शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दिसण्यावरून अन् इंग्रजी येत नसल्याने सासरच्यांनी मारले टोमणे, तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:43 IST

मे महिन्यात लग्न झाल्यानंतर दोघेही त्यांच्या घरी सुमारे २२ दिवस आनंदाने राहिले. त्यानंतर मुलगा अबू धाबीला निघून गेला.

केरळमधील मलप्पुरममध्ये एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात, मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे की, तिचा नवरा आणि सासरचे लोक तिच्या दिसण्यावरून, रंगावरून आणि इंग्रजी नीट येत नसल्याने तिला खूप टोमणे मारत होते.

१४ जानेवारी रोजी सकाळी मलप्पुरम जिल्ह्यातील कोंडोट्टी येथील घरी तरुणी मृतावस्थेत आढळली. मे महिन्यात तिचं लग्न अबू धाबीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाशी झालं होतं. शहानाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी तिला हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं.

मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात लग्न झाल्यानंतर दोघेही त्यांच्या घरी सुमारे २२ दिवस आनंदाने राहिले. त्यानंतर मुलगा अबू धाबीला निघून गेला. तिकडे गेल्यावर मात्र त्याने मुलीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि तिच्या रंगामुळे आणि इंग्रजी नीट येत नसल्यामुळे तिला त्रास देऊ लागला.

जेव्हा त्याने मुलीचे फोन घेणं बंद केलं, तेव्हा ती त्याला सतत मेसेज करत राहिली पण तो रिप्लाय देत नसे. अशा परिस्थितीत, जेव्हा तिने तिच्या सासूला याबद्दल सांगितलं तेव्हा सासू देखील मुलीलाच बोलू लागली. मुलाला सुंदर दिसणारी मुलगी हवी होती असं म्हणाली. तसेच आता ती तिच्या मुलासाठी एक चांगली जोडीदार शोधेल असं सांगितलं. यामुळेच तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळ