शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांच्या १८ रिक्षा जप्त, ४ जणांच्या टोळीस अटक; भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By नितीन पंडित | Updated: September 23, 2023 16:21 IST

यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

भिवंडी : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांचा तपास करून चार जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्या ताब्यातून २० लाख रुपयांच्या १८ रिक्षा जप्त करून तब्बल १२ गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहिती गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी शनिवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या रिक्षा ज्या भागातून चोरीस गेल्या होत्या त्या भागातील सीसीटिव्ही फुटेज व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून गुप्त बातमीदाराकडील माहितीच्या आधारे रिक्षा चोरी करणारी टोळी शहरातील नदी नाका येथे रिक्षा विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्या ठिकाणाहुन रशीद युनुस खान,वय ३८, रा.अंधेरी प.,सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना,वय ३८ वर्ष ,रा.मुंब्रा,एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी,वय ४२,रा.कौसा मुंब्रा,जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी,वय ३५ वर्ष रा.सिद्धीकीनगर,धुळे या चौघांना ताब्यात घेत त्याच्या जवळून ओशिवरा व जुहू पोलिस ठाणे हद्दीतून चोरी झालेल्या दोन रिक्षा जप्त केल्या.या चौकडीकडे अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यातून एकूण १८ रिक्षा गुन्हे शाखेने जप्त केल्या.

या चार जणांच्या टोळीतील मुंब्रा येथील सय्यद अली मोहम्मद अली शेख उर्फ मुन्ना व एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी हे दोघे वाहन कर्जांचे हप्ते थकीत असलेली वाहने रिकव्हरी करणारे एजेंट म्हणून काम करीत होते.त्यांना रिकव्हरी कंपनीने कामावरून काढून टाकले होते.मात्र त्यांना लॉक असलेली वाहने लॉक तोडून वाहन सुरू करुन घेऊन जाण्याची पद्धत माहित होती. काम सुटल्याने या दोघांनी वाहन चोरी करण्यास सुरुवात केली होती.हि चोरी केलेली वाहने धुळे येथील साथीदार जमील अहमद मोहम्मद तय्यब अन्सारी यास विक्री करीत होते.त्यानंतर जमील ही चोरी केलेल्या रिक्षा धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव या परिसरात विक्री करीत असल्याची माहिती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे,प्रफुल्ल जाधव, श्रीराज माळी,धनराज केदार,पोलीस उप निरीक्षक राजेंद्र चौधरी,निसार तडवी, हनुमंत वाघमारे,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रामचंद्र जाधव,रविंद्र पाटील, राजेश शिंदे,पोलिस हवालदार साबीर शेख,सुनिल साळुंखे,देवानंद पाटील,मंगेश शिर्के, रंगनाथ पाटील,किशोर थोरात,शशीकांत यादव,सचिन साळवी, वामन भोईर,राजेंद्र राठोड,प्रकाश पाटील,अमोल देसाई,महिला पोलिस हवालदार श्रेया खताळ,माया डोंगरे,पोलिस नाईक सचिन जाधव,भावेश घरत,सचिन सोनावणे,उमेश ठाकुर,जालींदर साळुंके, नितीन बैसाणे,पोलिस शिपाई अमोल इंगळे,रविंद्र साळुंके यांनी केली असून आरोपींकडून ओशिवरा,जुहू, बांगुर नगर,अंधेरी,आरे,मुंब्रा,भिवंडी शहर व निजामपूर पोलिस ठाणे हद्दीतील १२ रिक्षा चोरीचा उलगडा केला आहे. तर उर्वरित ६ रिक्षा नेमक्या कोणत्या पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्या याचा तपास भिवंडी गुन्हे शाखा करीत आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी