शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 02:03 IST

मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड उकळण्यात आला आहे.शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून होताना दिसत आहे. त्याकरिता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही अंकुश ठेवला जात आहे. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघात घडून वाहनचालकासह इतर पादचारी अथवा वाहनचालकांच्याही जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांचा शोध घेऊन कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार चालू वर्षात मागील आठ महिन्यांत एक हजार ७१३ जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३५० कारवाई जानेवारी महिन्यात केल्या आहेत. त्यामध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाºयांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात जमा झालेली दंडाची रक्कमही सर्वाधिक असून, ती आठ लाख ९०० रुपये इतकी आहे.

वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांमध्ये शिस्त लावण्यासंबंधीच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. तर महाविद्यालयीन तरुणांनाही शिस्तीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे प्रकार शहरात दिसून येत आहेत. अनेकदा त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांसोबतही वाद घातले जातात, त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या मदतीला स्थानिक पोलिसांचाही बंदोबस्त घेतला जात आहे. तर काही महिन्यांपूर्वी बेशिस्त वाहनचालकांचे चालक परवाने रद्द करण्याचीही मोहीम पोलिसांनी राबवली. मात्र, ठरावीक कालावधीनंतर त्यात खंड पडल्याने शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावू शकलेली नाही. परिणामी, चौकाचौकांमध्ये वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचे दर्शन घडत असून, त्यात दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकांची संख्या मोठी दिसत आहे. मागील दोन वर्षांत शहरातील रस्ते अपघातांच्या संख्येचा आलेख वाढत चालला आहे. २०१७ मध्ये ६२२ अपघात घडले होते, तर २०१८ मध्ये ७६७ रस्ते अपघात घडले आहेत. त्यामागे रस्त्यावरील खड्ड्यांपाठोपाठ मद्यपान करून वाहन चालवल्याचे कारण वेळोवेळी समोर आलेले आहे. यामुळे ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईत सातत्य राखले जाण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हCrime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई