शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Crime News: १७ वर्षांच्या तरुणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि मग घडवून आणले थरकाप उडवणारे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 16:02 IST

Crime News Update: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

ग्वाल्हेर -  मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे एका १७ वर्षांच्या मुलीने प्रियकराच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्या मार्फत आपल्या वडिलांची हत्या घडवून आणली. या तरुणीवर काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी हात उगारला होता. त्यामुळे या तरुणीचा राग अनावर झाला होता. त्यानंतर या तरुणीने क्राईम सिरियल पाहून या हत्याकांडाची योजना आखली. मात्र तिच्या मोबाईलमधील कॉल डिटेलने तिच्या कुकृत्याचे पितळ उघडे पाडले. दरम्यान पोलिसांनी ही तरुणी आणि तरुणाला अटक केली आहे. ( A 17-year-old girl caught her boyfriends Friend in a honeytrap and Caused a trembling act)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ ऑगस्ट रोजी रात्री थाटीपूर पोलिसांना तृप्तीनगरमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय रविदत्त दुबे यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. दुबे हे ग्वाल्हेर कलेक्ट्रेटमध्ये क्लार्क होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर फॉरेंसिक तपासणी करण्यात आली आणि मृतदेहाला पोस्टमार्टेमसाठी पाठवले. घरातील खोलीमध्ये झोपलेले असताना ही हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना कुटुंबीयांवरच संशय होता. पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा मृत रविदत्त यांच्या १७ वर्षांच्या मुलीवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जेव्हा तिच्या मोबाईलची कॉल डिटेल्स काढली तेव्हा ही अल्पवयीन मुलगी १५ दिवसांपासून एका विशिष्ट्य नंबरच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पोलिसांनी हा नंबर ट्रेस केला असता हा नंबर याच परिसरात राहणाऱ्या पुष्पेंद्रचा असल्याचे दिसून आले. दुसरीकडे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, या तरुणीचे करण राजौरिया नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

त्यानंतर पोलिसांनी या तरणीच्या प्रियकराची चौकशी केली. त्याच्याकडून पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या चौकशीनंतर आरोपी अल्पवयीन मुलीचा संयम सुटला आणि  तिने हत्येची बाब उघड केली. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी करण नावाच्या तरुणाला भेटत असे. एकदा रविदत्त यांनी तिला पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तिला घरी नेऊन तिला मारहाण केली होती. त्यामुळे तिने वडलांचा राग धरला होता. तसेच तिने प्रियकर करण याला वडिलांची हत्या करण्यास सांगितले. मात्र त्याने याला नकार दिला. तसेच तिच्यासोबत असलेले संबंधही संपुष्टात आणले.

त्यानंतर या तरुणीने करणचा मित्र पुष्पेंद्र लोधी याच्याशी मैत्री केली. तिने पुष्पेंद्रला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याला वडिलांची हत्या करण्यासाठी राजी केले. ४ ऑगस्ट रोजी या तरुणीने पुष्पेंद्रला घरी बोलावले. अखेरीस रात्री दोन वाजता पुष्पेंद्रने रविदत्त यांची हत्या केली आणि तिथून पळ काढला. आता थाटीपूर पोलिसांनी ही तरुणी आणि पुष्पेंद्रला बेड्या ठोकल्या आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशFamilyपरिवार