शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: १७ वर्षांच्या तरुणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि मग घडवून आणले थरकाप उडवणारे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 16:02 IST

Crime News Update: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

ग्वाल्हेर -  मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे एका १७ वर्षांच्या मुलीने प्रियकराच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्या मार्फत आपल्या वडिलांची हत्या घडवून आणली. या तरुणीवर काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी हात उगारला होता. त्यामुळे या तरुणीचा राग अनावर झाला होता. त्यानंतर या तरुणीने क्राईम सिरियल पाहून या हत्याकांडाची योजना आखली. मात्र तिच्या मोबाईलमधील कॉल डिटेलने तिच्या कुकृत्याचे पितळ उघडे पाडले. दरम्यान पोलिसांनी ही तरुणी आणि तरुणाला अटक केली आहे. ( A 17-year-old girl caught her boyfriends Friend in a honeytrap and Caused a trembling act)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ ऑगस्ट रोजी रात्री थाटीपूर पोलिसांना तृप्तीनगरमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय रविदत्त दुबे यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. दुबे हे ग्वाल्हेर कलेक्ट्रेटमध्ये क्लार्क होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर फॉरेंसिक तपासणी करण्यात आली आणि मृतदेहाला पोस्टमार्टेमसाठी पाठवले. घरातील खोलीमध्ये झोपलेले असताना ही हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना कुटुंबीयांवरच संशय होता. पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा मृत रविदत्त यांच्या १७ वर्षांच्या मुलीवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जेव्हा तिच्या मोबाईलची कॉल डिटेल्स काढली तेव्हा ही अल्पवयीन मुलगी १५ दिवसांपासून एका विशिष्ट्य नंबरच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पोलिसांनी हा नंबर ट्रेस केला असता हा नंबर याच परिसरात राहणाऱ्या पुष्पेंद्रचा असल्याचे दिसून आले. दुसरीकडे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, या तरुणीचे करण राजौरिया नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

त्यानंतर पोलिसांनी या तरणीच्या प्रियकराची चौकशी केली. त्याच्याकडून पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या चौकशीनंतर आरोपी अल्पवयीन मुलीचा संयम सुटला आणि  तिने हत्येची बाब उघड केली. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी करण नावाच्या तरुणाला भेटत असे. एकदा रविदत्त यांनी तिला पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तिला घरी नेऊन तिला मारहाण केली होती. त्यामुळे तिने वडलांचा राग धरला होता. तसेच तिने प्रियकर करण याला वडिलांची हत्या करण्यास सांगितले. मात्र त्याने याला नकार दिला. तसेच तिच्यासोबत असलेले संबंधही संपुष्टात आणले.

त्यानंतर या तरुणीने करणचा मित्र पुष्पेंद्र लोधी याच्याशी मैत्री केली. तिने पुष्पेंद्रला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याला वडिलांची हत्या करण्यासाठी राजी केले. ४ ऑगस्ट रोजी या तरुणीने पुष्पेंद्रला घरी बोलावले. अखेरीस रात्री दोन वाजता पुष्पेंद्रने रविदत्त यांची हत्या केली आणि तिथून पळ काढला. आता थाटीपूर पोलिसांनी ही तरुणी आणि पुष्पेंद्रला बेड्या ठोकल्या आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशFamilyपरिवार