शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:35 IST

जीआरपी जवान स्टेशनवर अशा प्रवाशांना टार्गेट करतात, जे लांबचा प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांना तपासाच्या नावाखाली ते रोखू शकतात.

मुंबई - एक प्रवासी रेल्वेतून त्याचे किंमती साहित्य घेऊन जात होता. स्टेशनवर उतरताच जीआरपी जवानांनी त्याला थांबवले आणि सामान दाखवण्यास सांगितले. त्याला एका खोलीत घेऊन गेले जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तपासात बॅगेतून जे मौल्यवान साहित्य सापडले ते तुझेच असल्याचे सिद्ध कर असं जवानांनी त्याला सांगितले. त्यावर तो प्रवासी घाबरला. त्यानंतर जो प्रकार घडला, तो वरिष्ठांपर्यंत पोहचला. या प्रकरणी जीआरपी जवानांना निलंबित करण्यात आले आहे. 

गेल्या पाच महिन्यांत मुंबईतील जीआरपीने खंडणीच्या आरोपाखाली १३ जीआरपी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर असे प्रकार उघडकीस येत आहेत. जीआरपी आयुक्त राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जीआरपी कर्मचाऱ्यांवरील ही कारवाई वेगाने सुरू आहे. लोकांना त्यांचे सामान फक्त गणवेशधारी कर्मचाऱ्यांकडूनच तपासण्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेल्या ठिकाणीच उघडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. रेल्वे प्रशासनाला जिथे जिथे अशा तक्रारी येतात तिथे जीआरपी कारवाई करते. आरपीएफकडेही कोणतीही तक्रार आल्यास ती जीआरपीकडे पाठवली जाते असं रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी म्हटलं. 

जीआरपी जवान स्टेशनवर अशा प्रवाशांना टार्गेट करतात, जे लांबचा प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांना तपासाच्या नावाखाली ते रोखू शकतात. कारण अशा प्रवाशांना सहज लक्ष्य केले जाऊ शकते. मुंबई स्थानकांवर सामानासह उतरल्यानंतर तपासणी दरम्यान रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू आढळल्यास प्रवाशांना अधिकाऱ्याला भेटण्यास सांगितले जात असे. त्यानंतर त्यांना एका खोलीत नेण्यात येते जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तिथे त्यांना रोख रक्कम, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची मालकी सिद्ध करण्यास सांगितले जात असे. हे सामान चोरीचे आहे, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, जेलमध्ये जावे लागेल अशी धमकीही त्यांना देण्यात येते. अनेक प्रकरणांमध्ये मारहाणीचीही नोंद झाली आहे. अशा प्रकारात त्रास टाळण्यासाठी प्रवासी तात्काळ पैसे देण्यास तयार होतात. 

दरम्यान, जीआरपीच्या तपासात असाच एक प्रकार समोर आला. ज्यात राजस्थानातील एक प्रवासी त्याच्या मुलीसह मुंबईत आला होता. त्याला धमकावून ३० हजार रुपये वसूल करण्यात आले. या प्रवाशाने राजस्थानात जाऊन जीआरपीकडे तक्रार केली. या प्रकरणी ३ जवानांना निलंबित करण्यात आले आहे. बऱ्याचदा गोव्यातून स्वस्त दारू आणली जाते, तेव्हा तपासाच्या नावाखाली जवानांकडून ती रोखली जाते, त्यांना जेलला पाठवण्याची भीती दाखवून वसुली केली जात असल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे