शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘तंटामुक्ती’ बक्षीस गाव विकासासाठी

By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST

शेख इलियास, कळमनुरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६७ गावांपैकी ६६ गावे तंटामुक्ती झाली आहेत.

शेख इलियास, कळमनुरीमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६७ गावांपैकी ६६ गावे तंटामुक्ती झाली आहेत. आतापर्यंत ४६ गावानाच बक्षिसाचा निधी मिळाला आहे. या निधीतून ४६ गावांचा विकास झाला आहे. महाराष्ट्रात २००७ पासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षातील १९ तंटामुक्त गावांना अद्याप निधी मिळालेला नाही. यावर्षी दोन पैकी एक गाव तंटामुक्त झाले असून, येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाकोडी हे गाव तंटामुक्त व्हायचे राहीले आहे. यावर्षी हेही गाव तंटामुक्त करून पोलीस ठाण्यांतर्गत येणारी सर्व गावे तंटामुक्त करण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सांगितले. बक्षिसाचा निधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवकांकडे सुपूर्द केला आहे. ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे हा निधी खर्च होतो. आतापर्यंत ४६ गावांना ८१ लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीतून गावाचा विकास साधला जात आहे. या निधीतून दिवाबत्ती, नाली बांधकाम, पाण्याचे संरक्षण तसेच ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे या निधीचा विनियोग केला जातो. २० गावांचा बक्षिसांचा निधी मिळाल्यानंतर त्या गावांचा विकास होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना बक्षिसाचा निधी दिला जातो. एक हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना एक लाख २ हजारांपर्यंतच्या गावाना २ लाख रुपये, तीन हजारापर्यंतच्या गावांना तीन ३ लाख रुपये, ५ हजारांपर्यंतच्या गावांना ५ लाख रुपये, ५ हजार ते १० हजारपर्यंतच्या गावांना ७ लाख तर १० हजार व त्याहून अधिक असलेल्या गावांना १० लाखांचा निधी दिला जातो. तंटामुक्तीचे विशेष पुरस्कार मिळालेले एकही गाव या पोलीस ठाण्यांतर्गत येत नाही.