शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कष्टकरी शेतमजुरांचा नांदगावला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 4:30 PM

नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली.

ठळक मुद्देभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव : सध्या नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने कष्टपूर्वक व महागडे बी-बियाणे खते यावर लाखो रु पये खर्च करून केलेल्या पेरण्या वाया गेल्यातच जमा असल्याने भयावह स्थिती उद्भवली असल्याने नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी शेतमजुरांचा मोर्चा काढून करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य काउन्सिलचे कॉम्रेड राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे, देवीदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. नांदगाव तालुक्याची अवस्था काळजी करावी अशी असून, तालुक्याच्या ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर शाळेत पदे रिक्त असल्याने शिकवायला शिक्षक नाही, वनजमिनींच्या तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या अनेक दाव्यांपैकी बहुतांशी दाव्यांचा निर्णय होऊ न शकल्याने ते प्रलंबित आहेत. ते निकाली काढावेत तसेच राज्यघटना संविधान प्रत दिल्ली येथे जाळणाऱ्यांचा निषेध, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या, जनावरांसाठी चारा छावण्या उभारा किंवा चारा उपलब्ध करून द्या, नांदगाव तालुक्याला मांजरपाडा-१ मधून नारपारचे पाणी समन्यायी पद्धतीने द्या, शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करा, कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमीन कसणाºयांच्या नावे करा, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या, शेतमजूर, कामगार यांना गावपातळीवरती रोजगार हमीतून कामे उपलब्ध करू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकरी आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, ३५३ कलमचा गैरवापर थांबवा खोट्या केसेस मागे घ्या, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन दरमहा सात हजार देण्याचा कायदा करा यांसह इतर मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी यांना सादर करण्यात आले. विजय दराडे, देवचंद सुरसे, शांताराम पवार, जयराम बोरसे, कोंडीराम माळी, निंबा आहेर, प्रकाश भावसार, रामदास जाधव, श्रवण पवार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ज्येष्ठ दिवंगत कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल तसेच मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्यासह आत्महत्या केलेल्या शेतकºयांना भाकप किसान सभेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.