शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आठ गाव पाणीपुरवठा योजनेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: May 23, 2014 01:10 IST

मोहन बोराडे , सेलू आठ गाव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही पाणी अद्यापही मिळत नसल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

 मोहन बोराडे , सेलू आठ गाव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही या योजनेचे पाणी अद्यापही योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना मिळत नसल्यामुळे आठ गावात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. १९९९ साली आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. या योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणी मिळते. परंतु जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मागील चौदा वर्षापासून या योजनेतील गावे पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या योजनेवर आजपर्यंत ११ कोटी खर्च झाला आहे. आठ गाव पाणीपुरवठा योजनेत देऊळगाव गात, गुगळी धामणगाव, कुंडी, म्हाळसापूर, डासाळा, तिडी पिंपळगाव, आहेरबोरगाव व मानवत तालुक्यातील मानोली या गावांचा समावेश आहे. योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र रवळगाव येथे उभारण्यात आले आहे. या केंद्रात निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे ही योजना कार्र्यान्वित होईल,अशी अपेक्षा होती. परंतु या योजनेच्या जलवाहिणी ठिकठिकाणी फुटली आहे.अनेक ठिकाणी कुजली आहे तर पाईपलाईन देखील गायब झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागााकडून योजना कार्यान्वित करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. उन्हाळा संपत आला तरी या योजनेचे पाणी संबंधित गावांना अद्यापही मिळालेली नाही. जलशुद्धीकरण केंद्रातून संबंधित गावच्या जलकुंभापर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यात डासाळा व मानोली येथील जलकुंभ अद्यापही कोरडेच आहेत. उर्वरित सहा गावातील जलकुंभापर्यंत योजनेचे पाणी पोहचले तरी गावा अंतर्गत पाणी पाईपलाईनला जोडले नसल्यामुळे या गावाना पाणी मिळालेले नाही. आठ गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना इतर शासनाची योजना मिळत नाही व आठ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणीही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या गावातील पाण्याची मदार हातपंप, बोअरवेल व जुनाट झालेल्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. दरवर्षी उन्हाळ्यात संबंधित विभागाकडून या योजनेची डागडुजी करण्यात येते. योजनेचे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आठ गाव पाणीपुरवठा योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र रवळगाव येथे आहे. गावांना पाणी सोडण्यासाठी तीन ठिकाणी पंप हाऊस तयार करण्यात आले आहेत. सुरळीत पाणी मिळण्यासाठी तीनही ठिकाणी वीज एकाच वेळी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मागील दोन महिन्यांपासून या योजनेच्या डागडुजीचे काम सुरू आहे. पाऊस पडण्याची वेळ आली असतानाही या योजनेचे काम मिळालेले नाही.उन्हाळा आला की, प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना या योजनेची आठवण येते. डागडुजीवर खर्च ही करण्यात येतो. या योजनेचे निम्मे आयुष्य संपले आहे. आगामी काळातही या योजनेचे पाणी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेतील गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मिळणे आवश्यक आहे. या योजनेचे जलशुद्धीकरण केंद्रातही बिघाड झालेला आहे. चौदा वर्षापासून योजनेचे काम सुरू असल्यामुळे बरेचसे साहित्य कुचकामी झाले आहे. त्यामुळे या योजनेचा काहीच उपयोग नाही,अशी प्रतिक्रिया जि.प. सदस्य राजेंद्र लहाने यांनी दिली.