शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

आठ गाव पाणीपुरवठा योजनेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: May 23, 2014 01:10 IST

मोहन बोराडे , सेलू आठ गाव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही पाणी अद्यापही मिळत नसल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

 मोहन बोराडे , सेलू आठ गाव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही या योजनेचे पाणी अद्यापही योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना मिळत नसल्यामुळे आठ गावात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. १९९९ साली आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. या योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणी मिळते. परंतु जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मागील चौदा वर्षापासून या योजनेतील गावे पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या योजनेवर आजपर्यंत ११ कोटी खर्च झाला आहे. आठ गाव पाणीपुरवठा योजनेत देऊळगाव गात, गुगळी धामणगाव, कुंडी, म्हाळसापूर, डासाळा, तिडी पिंपळगाव, आहेरबोरगाव व मानवत तालुक्यातील मानोली या गावांचा समावेश आहे. योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र रवळगाव येथे उभारण्यात आले आहे. या केंद्रात निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे ही योजना कार्र्यान्वित होईल,अशी अपेक्षा होती. परंतु या योजनेच्या जलवाहिणी ठिकठिकाणी फुटली आहे.अनेक ठिकाणी कुजली आहे तर पाईपलाईन देखील गायब झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागााकडून योजना कार्यान्वित करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. उन्हाळा संपत आला तरी या योजनेचे पाणी संबंधित गावांना अद्यापही मिळालेली नाही. जलशुद्धीकरण केंद्रातून संबंधित गावच्या जलकुंभापर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यात डासाळा व मानोली येथील जलकुंभ अद्यापही कोरडेच आहेत. उर्वरित सहा गावातील जलकुंभापर्यंत योजनेचे पाणी पोहचले तरी गावा अंतर्गत पाणी पाईपलाईनला जोडले नसल्यामुळे या गावाना पाणी मिळालेले नाही. आठ गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना इतर शासनाची योजना मिळत नाही व आठ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणीही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या गावातील पाण्याची मदार हातपंप, बोअरवेल व जुनाट झालेल्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. दरवर्षी उन्हाळ्यात संबंधित विभागाकडून या योजनेची डागडुजी करण्यात येते. योजनेचे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आठ गाव पाणीपुरवठा योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र रवळगाव येथे आहे. गावांना पाणी सोडण्यासाठी तीन ठिकाणी पंप हाऊस तयार करण्यात आले आहेत. सुरळीत पाणी मिळण्यासाठी तीनही ठिकाणी वीज एकाच वेळी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मागील दोन महिन्यांपासून या योजनेच्या डागडुजीचे काम सुरू आहे. पाऊस पडण्याची वेळ आली असतानाही या योजनेचे काम मिळालेले नाही.उन्हाळा आला की, प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना या योजनेची आठवण येते. डागडुजीवर खर्च ही करण्यात येतो. या योजनेचे निम्मे आयुष्य संपले आहे. आगामी काळातही या योजनेचे पाणी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेतील गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मिळणे आवश्यक आहे. या योजनेचे जलशुद्धीकरण केंद्रातही बिघाड झालेला आहे. चौदा वर्षापासून योजनेचे काम सुरू असल्यामुळे बरेचसे साहित्य कुचकामी झाले आहे. त्यामुळे या योजनेचा काहीच उपयोग नाही,अशी प्रतिक्रिया जि.प. सदस्य राजेंद्र लहाने यांनी दिली.