शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक

By admin | Updated: May 15, 2014 23:21 IST

मुंब्रा येथील सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता नसतानाही महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्याचे समोर आले आहे.

सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूकमान्यता नसताना विद्यार्थ्यांना दिले प्रवेश : विद्यार्थ्यांचे वर्ष वायामुंबई :मुंब्रा येथील सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता नसतानाही महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी घेतलेली कागदपत्रे आणि पैसेही परत देण्यास नकार दिल्याने पालक हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी पालक पोलिस ठाण्यात धाव घेणार आहेत.सेंट मेरी डिग्री महाविद्यालय गेल्या शैक्षणिक वर्षापासून खौसा मुंब्रा येथे सुरु करण्यात आले. परंतू महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रशासनाने विद्यापीठाकडून मान्यताच घेतली नाही. असे असतानाही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेशही दिले. येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखा सुरु करण्यात आल्या. कला आणि वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांकडून खूपच कमी प्रतिसाद मिळाल्याने महाविद्यालयाने या शाखा सुरु केल्या नाहीत. मात्र, एफ.वाय.बी.कॉमसाठी सुमारे २५ विद्यार्थी आल्याने महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मात्र, विद्यापीठाकडून या अभ्यासक्र्रमाला मान्यताच नसल्याने महाविद्यालयाने पहिल्या सत्राची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत नसल्याने पालकांनी महाविद्यालयाकडे विचारणा केली. तेव्हा महाविद्यालयाने प्रवेशासाठी दिलेली कागदपत्रे परत घेऊन जाण्यास सांगितले.याबाबत पालकांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. मात्र, विद्यापीठाने या महाविद्यालयाला मान्यताच दिली नसल्याने महाविद्यालयावर कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी पालकांना कोणतीही याबाबतची कोणतीही सुचना दिली नव्हती. यामुळे पालकांनीही महाविद्यालयावर विश्वास ठेवत विद्यार्थ्यांचे प्रवेश निि›त केले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरल्यानंतर दिलेल्या पावतीमध्ये महाविद्यालयाला विद्यापीठाची मान्यता असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, आता महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा घेण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. महाविद्यालयाकडून आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर पालक पोलिसांकडे लवकरच दाद मागणार आहेत.महाविद्यालाने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून साडे चार हजार रुपये शुल्क घेतले होते. मात्र, हे शुल्कही परत देण्यास महाविद्यालयाने नकार दिला असल्याचे, एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.महाविद्यालयाला विद्यापीठाकडून मंजूरी घेण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने महाविद्यालयाला मंजूरी दिलेली नाही. यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. यासाठी विद्यार्थ्यांची घेतलेली कागदपत्रे आणि शुल्क परत देण्यात आले असून आता कोणतीही समस्या नसल्याचे, महाविद्यालयाच्या प्राचार्या तेलिलका यांनी सांगितले.