शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बालभारती : दोन पदांवरील नियुक्त्यांबाबत ढिलाई काम करणारेही तेच, तपासणारेही तेच

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM

--------पुणे: राज्य सरकारच्या बहुसंख्य खात्यांमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या दोन पदांवर केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त्या केल्या जातात. राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेत मात्र गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पदांवर मंडळातीलच अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

--------पुणे: राज्य सरकारच्या बहुसंख्य खात्यांमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या दोन पदांवर केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त्या केल्या जातात. राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेत मात्र गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पदांवर मंडळातीलच अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सरकारी आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त असावी, पारदर्शकता असावी या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारमध्ये ऑडिट जनरल हा स्वतंत्र विभाग आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकारच्या ऑडिट जनरल विभागांपैकी एकाकडून दरवर्षी लेखापरिक्षण होत असते. येणारे पैसे व जाणारे पैसे अशा दोन्ही स्तरावर या दोन पदांकडून परिक्षण केले जाते. त्यासाठी या दोन्ही पदांवरील नियुक्त्या या विभागाकडून केल्या जातात. केंद्र सरकारचे अधिकारी आहेत तिथे राज्य सरकारकडून परिक्षण होत नाही व राज्य सरकारचे आहेत तिथे केंद्राकडून नियुक्त्या होत नाहीत.
बालभारती संस्थेकडून शालेय पाठ्यपुस्तकांची खरेदी व विक्री होत असल्यामुळे त्यांची वार्षिक उलाढाल जवळपास ५०० कोटी रूपयांची आहे. त्यामुळे बालभारतीमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी अशी दोन्ही पदे केंद्र सरकारकडून नियुक्त केली जातात. त्यापैकी अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या पदावर असलेले सुहास परळे जून २०१४ मध्ये निवृत्त झाले. वित्त व लेखाधिकारी असलेल्या सुहास कुलकर्णी यांची ऑगस्ट २०१४ मध्ये बदली झाली.
त्यानंतर या दोन्ही पदांवर स्थानिक अधिकार्‍यांमधूनच नियुक्ती केली जात आहे. बालभारतीमध्ये मॅनेजर, स्टॉक ॲण्ड डिस्ट्रीब्यूटर्स या पदावर काम करणारे ए. डी. गायकवाड यांच्याकडे केंद्र सरकारच्या वित्त व लेखाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. बालभारतीत असिस्टंट फायनान्स ऑफिसर असलेल्या राजेंद्र पवार यांच्याकडे अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. गेल्या वर्षभरापासून हेच दोन अधिकारी केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त केल्या जाणार्‍या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या मुळ पदाचे काम सांभाळून ते हा अतिरिक्त कार्यभारही पहात आहेत.
यातील गंभीर बाब अशी आहे की गायकवाड व पवार यांच्याकडे बालभारतीमध्ये असलेल्या पदांवरून झालेले कामकाजच प्रामुख्याने केंद्र सरकारच्या पदांकडून तपासले जात असते. त्यामुळे त्यांच्या कामाचे तेच परिक्षण करीत आहे अशी स्थिती बालभारतीमध्ये गेले तब्बल वर्षभर आहे.

जोड आहे,----------------------------