शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अंगणवाडी स्पेशल ड्राईव्ह (विलास) 3 महागाई तिपटीने वाढली; मानधनात वाढ नाही! सापत्नभाव दूर करा: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची भूमिका

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

सोलापूर: अंगणवाडी सेविका, मदतनिसांना 2011 साली केंद्र सरकारने 1500 आणि 750 रु मानधन वाढ केली होती. त्यामुळे सेविकांना 3 हजार रु. आणि मदतनिसांना 1500 मानधन मिळते. यात राज्य शासन 1 हजार आणि 500 अशी भर टाकते; मात्र आज महागाई तिपटीने वाढलेली असताना अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनामध्ये मात्र वाढ झालेली नाही. ‘आईनंतर आम्ही’च या भावनेतून काम करणार्‍या कर्मचार्‍यांबाबतीत असलेला सापत्नभाव दूर करावा, अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघ मांडत लढा देत असल्याचे राज्याचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.

सोलापूर: अंगणवाडी सेविका, मदतनिसांना 2011 साली केंद्र सरकारने 1500 आणि 750 रु मानधन वाढ केली होती. त्यामुळे सेविकांना 3 हजार रु. आणि मदतनिसांना 1500 मानधन मिळते. यात राज्य शासन 1 हजार आणि 500 अशी भर टाकते; मात्र आज महागाई तिपटीने वाढलेली असताना अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनामध्ये मात्र वाढ झालेली नाही. ‘आईनंतर आम्ही’च या भावनेतून काम करणार्‍या कर्मचार्‍यांबाबतीत असलेला सापत्नभाव दूर करावा, अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघ मांडत लढा देत असल्याचे राज्याचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.
खासदार चंद्रेश कुमारी यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने देशातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या सेवाशर्तीचा विचार करण्यासाठी महिला खासदारांची समिती गठीत केली होती. या समितीने आपला अहवाल 10 ऑगस्ट 2011 रोजी लोकसभेत व राज्यसभेत सादर केला होता. समितीने अंगणवाडी कर्मचार्‍यांना वेतनर्शेणी व महागाई भत्ता द्यावा अशी शिफारस केली होती. त्याची आजवर अंमलबजावणी झालेली नाही. इंडियन लेबर कॉन्फरन्सच्या 45 व्या सेशनमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या सेवाशर्तीचा विषय चर्चेला आला होता. त्यात या कर्मचार्‍यांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षाचे फायदे लागू करण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे.
एबासिवे योजना ही मध्यवर्ती शासनाची योजना आहे. त्यामुळे मध्यवर्ती सरकारवर देशभराच्या अंगणवाडी कर्मचार्‍यांनी अनेक मोर्चे काढले आहेत. मागील सरकार गेले, भाजप सरकार आले तरी त्यांनीही अद्याप अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या सेवाशर्ती सुधारण्यासाठी तरतूद केली नाही उलट या योजनेसाठी लागणारा निधी निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी केला आहे. आतातर अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन राज्य सरकारने द्यावे, असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन वाढवण्याची जबाबदारी राज्य सरकारची की, केंद्र सरकारची आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सहा महिन्यांचे मानधन थकले
अंगणवाडी कर्मचार्‍यांना सध्या देण्यात येणारे मानधन अत्यंत कमी आहे. त्यांना केंद्र व राज्य सरकार झुलवत ठेवण्याचे काम करीत आहे. सध्या देण्यात येणारे मानधन व अंगणवाडी केंद्राचे भाडे वेळेवर दिले जात नाही. आता महाराष्ट्रातील सेविका/मदतनिसांचे सहा महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे. लाभार्थ्यांना योग्य आहार मिळत नाही. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी 2 सप्टेंबरला राज्यभर एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. शासनस्तरावरुन त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाहीतर 24 ऑक्टोबरला पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिला.
कोट/फोटो
राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांतर्गत रोजगार मिळाला आहे. या महिला कष्टकरी, बहुजन वर्गातील आहेत. या सेविकांमुळे मुलांचे कुपोषण निर्मूलन होत आहे. आरोग्याच्या चांगल्या सेवा त्यांना यांच्या माध्यमातून मिळत आहेत. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पोलीओमुक्त झाला. विकास प्रक्रियेत अंगणवाडी सेविकांचे मोलाचे योगदान आहे. मात्र सरकार यांना वेठबिगारीसारखी वागणूक देत आहे. संघर्षाशिवाय काही मिळत नाही, अशी यांची स्थिती झाली आहे. सध्याचे सरकार खासगी अंगणवाड्यांना मान्यता देण्याचे धोरण अवलंबत आहे. ते बंद व्हायला हवे. अंगणवाडी सेविकांच्या हक्कासाठी कर्मचारी संघ कायम सोबत राहणार आहे.
- सूर्यमणी गायकवाड, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ
राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची भूमिका
---
सेविका, मदतनिसांच्या प्रमुख मागण्या
मार्चपासून थकलेले मानधन द्या.
मानधन देण्यासाठी उणे तरतुदीत बीडीएसची सुविधा सुरु करा.
एकात्मिक बालविकास सेवा योजना 1975 पासून तात्पुरती योजना म्हणून राबवली जात आहे.तिचे शासकीय विभागात रुपांतर करावे.
खा. चंद्रेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील खासदार समितीच्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी.
पाच हजार रुपये भाऊबीज भेट (बोनस) देण्यात यावी.