शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो, कारण..., राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:38 IST

भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.

अंबिकापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी भाजपवर आदिवासींचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला. भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो कारण आदिवासींनी मोठी आणि प्रगतीची स्वप्ने पाहावीत, असे त्यांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.छत्तीसगडच्या अंबिकापूर मतदारसंघातील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधानांवर हल्ला चढवत म्हटले की, ते स्वत:ला इतर मागासवर्गीय (ओबीसी) व्यक्ती म्हणवतात, पण जेव्हा मागासवर्गीयांना पाठिंबा देण्याची वेळ येते तेव्हा ओबीसी ही जात नाही, असे ते म्हणतात.राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या एका नेत्याने आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. ते जनावरांवर लघवी करत नाहीत, मात्र आदिवासींसोबत असे प्रकार करतात. ही भाजपची मानसिकता आहे. वनवासी म्हणजे जंगलात राहणारे. भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो, आम्ही आदिवासी म्हणतो. भाजप तुमचे हक्क हिसकावून घेते.

शिकू नका, का म्हणतात?- येत्या १५-२० वर्षात जंगले नाहीशी झाली तर वनवासी कुठे जाणार? ते (भाजप) तुम्हाला (आदिवासींना) म्हणतात की, इंग्रजी शिकू नका, कारण तुम्ही मोठी स्वप्ने पाहू नयेत किंवा ती पूर्ण होऊ नयेत, अशी त्यांची इच्छा आहे. पंतप्रधान प्रत्येक भाषणात स्वत:ला ओबीसी म्हणवून घेतात आणि ओबीसींच्या कल्याणाविषयी बोलतात. जातीची जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली तेव्हा ते म्हणाले की, एकच जात आहे आणि ती म्हणजे ‘गरीब’. मग तुम्ही स्वतःला ओबीसी का म्हणता? एकच जात असेल तर तो श्रीमंत कोण, असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

साहेबांनी आज सकाळीच सांगितले. सकाळी लवकर, माझ्या नामांकनाच्या वेळी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सुरेश धिंगाणी यांच्या घरी ईडी पाठविली आहे. साहेब, छत्तीसगडियांना दुर्बल आणि भित्रा समजू नका. ते त्यांचा भात खातात तेही पूर्ण स्वाभिमानाने.   छत्तीसगडियांच्या स्वाभिमानाची ही गोष्ट आहे.- भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड

टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस