शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रेल्वेने तहान भागविलेल्या लातुरात यंदा शून्य टँकर

By admin | Updated: May 12, 2017 23:41 IST

लातूर : यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत.

हणमंत गायकवाड । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गतवर्षी लातूर शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. शिवाय, जिल्हाभरात सरकारी यंत्रणेसह सामाजिक संस्था, संघटनांच्या जवळपास १३०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत. जलसंधारणाच्या कामाचा चांगला इफेक्ट झाला असून, दोन मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. जे की, गतवर्षी उन्हाळ्यात कोरडेठाक होते. गतवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात अभूतपूर्व पाणीटंचाईने लातूरकर हैराण झाले होते. मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटले होते. डोंगरगाव, माकणी, धनेगाव बॅरेजेस या दोन-तीन स्त्रोतांत थोडेबहुत पाणी होते. अन्य स्त्रोत पूर्णत: कोरडे पडले होते. यामुळे लातूरला मिरजेहून रेल्वेने पाणी आणावे लागले. शिवाय, टँकरद्वारेही पाण्याचे संकलन व वितरण करावे लागले. शहरात मनपाचे ७० तर विलासराव देशमुख फाऊंडेशनचे ७०, शिवसेना, व्हीएस पँथर, अष्टविनायक प्रतिष्ठान, दयानंद शिक्षण संस्था, तय्यबा चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र विकास आघाडी, मनसे, महिंद्रा कोटक बँक, मारवाडी शिक्षण संस्था आदी संस्था-संघटनांचे मिळून ४६६ टँकर शहरात मोफत पाणीपुरवठा करीत होते. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ३५७ व विविध संस्थांचे १९२ असे एकूण शहर व जिल्ह्यात १३०० टँकरचा मोफत पाणीपुरवठा होता. यंदा मात्र मुबलक पाणीसाठा असल्याने एकही टँकर नाही. यंदा पिण्यासाठी तर सोडाच; घरगुती वापरासाठीही पाणी विकत घेण्याची गरज नाही. या पाणीटंचाईमुळे जलसाक्षरता वाढली असून, शहरात बहुतांश बोअरचे पुनर्भरण करण्यात आले असून, छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची योजना यशस्वी राबविली आहे. त्यामुळे यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातही पाणीपातळीत समतोल आहे. शहरात मनपाच्या मालकीचे ६०० बोअर असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही बोअर बंद पडल्याचे ऐकिवात नाही.