शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

रेल्वेने तहान भागविलेल्या लातुरात यंदा शून्य टँकर

By admin | Updated: May 12, 2017 23:41 IST

लातूर : यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत.

हणमंत गायकवाड । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गतवर्षी लातूर शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती. शिवाय, जिल्हाभरात सरकारी यंत्रणेसह सामाजिक संस्था, संघटनांच्या जवळपास १३०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र जिल्ह्यात एकही टँकर नाही की, कोण्या गावात टंचाईच्या झळा नाहीत. जलसंधारणाच्या कामाचा चांगला इफेक्ट झाला असून, दोन मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. जे की, गतवर्षी उन्हाळ्यात कोरडेठाक होते. गतवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात अभूतपूर्व पाणीटंचाईने लातूरकर हैराण झाले होते. मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटले होते. डोंगरगाव, माकणी, धनेगाव बॅरेजेस या दोन-तीन स्त्रोतांत थोडेबहुत पाणी होते. अन्य स्त्रोत पूर्णत: कोरडे पडले होते. यामुळे लातूरला मिरजेहून रेल्वेने पाणी आणावे लागले. शिवाय, टँकरद्वारेही पाण्याचे संकलन व वितरण करावे लागले. शहरात मनपाचे ७० तर विलासराव देशमुख फाऊंडेशनचे ७०, शिवसेना, व्हीएस पँथर, अष्टविनायक प्रतिष्ठान, दयानंद शिक्षण संस्था, तय्यबा चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र विकास आघाडी, मनसे, महिंद्रा कोटक बँक, मारवाडी शिक्षण संस्था आदी संस्था-संघटनांचे मिळून ४६६ टँकर शहरात मोफत पाणीपुरवठा करीत होते. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ३५७ व विविध संस्थांचे १९२ असे एकूण शहर व जिल्ह्यात १३०० टँकरचा मोफत पाणीपुरवठा होता. यंदा मात्र मुबलक पाणीसाठा असल्याने एकही टँकर नाही. यंदा पिण्यासाठी तर सोडाच; घरगुती वापरासाठीही पाणी विकत घेण्याची गरज नाही. या पाणीटंचाईमुळे जलसाक्षरता वाढली असून, शहरात बहुतांश बोअरचे पुनर्भरण करण्यात आले असून, छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची योजना यशस्वी राबविली आहे. त्यामुळे यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातही पाणीपातळीत समतोल आहे. शहरात मनपाच्या मालकीचे ६०० बोअर असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही बोअर बंद पडल्याचे ऐकिवात नाही.