शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

स्वातंत्र्याची युवकांची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : स्वातंत्र्यात मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होतो, तसेच स्वातंत्र्य म्हणजे, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था, स्वतःचे तंत्र ...

औरंगाबाद : स्वातंत्र्यात मुक्ती, हक्क, जबाबदारी या जाणिवांचा संगम होतो, तसेच स्वातंत्र्य म्हणजे, स्वतः निर्माण केलेली व्यवस्था, स्वतःचे तंत्र आणि स्वतःचे बंधन. १५ ऑगस्ट १९४७ ला परकीय शक्तीच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यापासून भारतीयांसमोर अनेक आव्हाने आहेत. आज जगात सर्वांत जास्त युवा लोकसंख्या भारतात आहे. त्यांना भ्रष्टाचार, गरिबीपासून मुक्ती, मोफत शिक्षण आणि आरोग्यसेवा, शेतकरी-मजुरांच्या कष्टाला किंमत, अर्थ- विज्ञान- तंत्रज्ञानात प्रगती, अभिव्यक्ती हे ज्वलंत विषय ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेशी निगडित वाटतात.

...........................

मानसिक गुलामगिरी संपावी

सामान्य माणसाला स्वातंत्र्य हवे आहे निखळ स्वच्छंदी जगण्याचे. राज्यघटनेने दिलेले अधिकार वापरण्याची सद्बुद्धी ठरावीक जणांकडेच आहे. आज भारत बहुप्रमाणात मानसिक गुलामगिरीत पिचलेला आहे. राजकीय नेते, बुवाबाबा यांची हांजीहांजी करण्यापुरते अनेकांचे स्वातंत्र्य सीमित झालेय. आज कुणीही कुणाची चिकित्सा करत नाही. सगळेच ‘हो’ला ‘हो’ लावतात. यातून स्वतंत्र होणे आजघडीला महत्त्वाचे आहे. प्रत्येक जण आपल्या सोईनुसार स्वातंत्र्याची व्याख्या करत आहे; परंतु जातीअंत, राजकीय, आर्थिक आणि स्त्री-पुरुष समानता यातून मिळालेले सामाजिक स्वातंत्र्य आज देशाला महासत्ता बनवेल.

- श्रद्धा खरात, संशोधिका

........

‘ब्राइट फ्युचर’साठी शिस्त हवीच

स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेकांचे तारुण्य स्वैराचारात जात आहे. यामुळे घरातील ज्येष्ठांनी लावलेली शिस्त आणि बंधने असायलाच हवीत, नसता आजचे स्वातंत्र्य उद्या महागात पडू शकते. बेबंद आयुष्याला लगाम द्यावा लागतो, लगाम ओढणारे कोणीच नसेल, तर आयुष्यच उधळले जाईल. स्वातंत्र्यासोबत मिळालेल्या हक्कांसोबत सर्वांनी जबाबदारीचेही पालन करावे. यातच मला ब्राइट फ्युचर दिसते.

-धनश्री भोसले, विद्यार्थिनी

...............................

‘डीपी’ नको विचार बदलावे

स्वातंत्र्य दिन आला की, सोशल मीडियावर देशभक्तीचा पूर येतो. डिस्प्ले पिक्चर बदल, स्टेटस ठेव, मोठ्याने गाणी लाव, असे दिवसभर चालते. मात्र, वर्षभर एक जबाबदार नागरिक म्हणून वागणे हे खरे स्वातंत्र्य आहे. सार्वजनिक स्वच्छता पाळणे, नियमित कर भरणे, स्वदेशीचा वापर वाढवणे आणि मतदानाचा हक्क बजावणे यातून खऱ्या अर्थाने देशभक्ती दिसून येईल.

-अपूर्वा कुलकर्णी, संशोधिका

................

सामाजिक पारतंत्र्यातून मुक्त करा

स्वातंत्र्य मिळाले. मात्र, आजही देश सामाजिक पारतंत्र्यात आहे. समतेसाठी आजही झगडावे लागते. मागासवर्गीयांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या रोखण्यात ७४ वर्षांतही अपयश आले आहे. देशातील गरीब-श्रीमंत, उच्चवर्णीय-कनिष्ठवर्णीय, व्यापारी-शेतकरी, उद्योगपती ते कामगार यांच्यातील दरी जेव्हा कायमची मिटेल तेव्हा खऱ्या अर्थाने बलसागर भारत होईल. महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पूजन नको, अंमलबजावणी व्हावी.

-संतोष अंभोरे, विद्यार्थी

...................

आपले मत बाळगण्याचे, ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे. शासनाचे धोरण आपल्याला चुकीची वाटत असल्यास त्याविरोधात मत व्यक्त केल्यास भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्याप्रमाणे देशद्रोहाचे खटले स्वतंत्र भारतात तर दाखल व्हायला नकोत. मॉब लिंचिंग, ऑनर किलिंग वा इतर कुठलीही भीती नसावी. विशिष्ट समाजघटकांना अजूनही असमान वागणूक दिली जाते, हे बंद होऊन, आवडेल तशी वेशभूषा, खाणे, राहणे हे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून स्वीकारले पाहिजे. हे सर्व सहजपणे करता येत असेल, तरच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत, असे म्हणता येईल.

-मुकुल निकाळजे, अभ्यासक