शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : खैरेंच्या कामगिरीवर तरुणांचे प्रश्नचिन्ह; ‘युवांचा आदित्य’ कार्यक्रमात प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:58 IST

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ‘युवांचा आदित्य’ या संवाद कार्यक्रमात प्रश्नांचा भडीमार

ठळक मुद्देखासदारांनी २० वर्षांत काय केले‘युवांचा आदित्य’ संवाद कार्यक्रमात तरुण मतदारांच्या प्रश्नांवर ठाकरेंची उत्तरे

औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना २० वर्षांपासून आम्ही निवडून देतोय. तेच प्रश्न आजही कायम आहेत. आता त्यांना का निवडून द्यावे, कचरा प्रश्नावरून दंगल झाली, येथील सामाजिक सलोखा संपला. जालना रोडसारख्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम करता आले नाही. नाशिकच्या तुलनेत औरंगाबाद मागे पडलेले आहे. औरंगाबादचा विकास त्या धर्तीवर का झाला नाही, या व इतर अनेक प्रश्नांचा भडिमार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ‘युवांचा आदित्य’ या संवाद कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आला. ठाकरे यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तितक्याच अभ्यासपूर्ण आणि लडिवाळ शैलीत देऊन प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

खैरे यांनी २० वर्षांत शहरासाठी काय केले, या प्रश्नाचे उत्तर देताना आदित्य म्हणाले, शहर एका माणसामुळे मागे-पुढे जात नाही. खासदार दिल्लीत असतात. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाने स्मार्ट सिटीतून त्यांनी निधी आणला. १०० बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू केली. ४०० मेट्रिक टन कचरा येथे निर्माण होतो. मुंबईतही कचरा समस्या होती. कचऱ्याचा प्रश्न सर्वांचा असून, वर्गीकरण करणे गरजेचे आहे. येथील मनपाचे बजेट कमी आहे. जीएसटी लागल्यामुळे शासनाकडे वर्षानुवर्ष अनुदानासाठी वाट पाहावी लागते आहे. कचऱ्याचे ४ प्रकल्प सुरू केले आहेत, तीन महिन्यांत कच-याचा निचरा होईल. १२० कोटी रस्त्यांसाठी आणले, लॉ विद्यापीठ, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, भूमिगत गटार योजनेंतर्गत एसटीपीची कामे झाली आहेत.

सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरु ण मतदार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी ठाकरे यांनी तासभर संवाद साधला. शिक्षण, महिला सुरक्षा, राजकारण, पर्यटन, क्रीडा, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण, महाविद्यालयीन निवडणुकांबाबत तरुण मतदार, विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. मुंबईसह जगभरातील बदल, शिक्षणातील नवीन प्रवाहाची उदाहरणे ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिली.तरुण मतदारांच्या मनातील प्रश्न

विद्या कोठावळेने महिला सुरक्षेबाबत प्रश्न केला. दिनेश वंजारे याने शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या उदरनिर्वाहासाठी उपाययोजनांची मागणी केली. प्रशांत मोहोळ याने प्लास्टिक बंदीबाबत प्रश्न केला. वैष्णवी पाठक हिने अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत असावेत, अशी मागणी केली. प्रतीक्षा थोरात हिने औरंगाबाद पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या स्तरावर पोहोचावे, यासाठी काय प्रयत्न करणार, असे विचारले. सिद्धी कटारिया हिने शिवसेना व इतर पक्षांत काय फरक आहे, यावर प्रश्न केला. अक्षय खेडकर याने राजकारणात तरुणांना संधी मिळते का? याबाबत ठाकरे यांना विचारले. गुंजन शर्मा याने निवडणूक लढण्याबाबत प्रश्न केला. सायली घोडके हिने वैद्यकीय तर प्रवीण पाटील याने अभियांत्रिकी शिक्षणावर प्रश्न केला. चंचल अहिरे, हेमंत खांडकुळे, समृद्धी, रेणू या विद्यार्थ्यांनी तरुणांना वाव मिळत नसल्यामुळे होणारी घुसमट मांडली.

सर्व प्रश्न सुटले की लग्न करणारसर्व प्रश्न सुटले की, लग्न करणार असल्याचे आदित्य यांनी एका प्रश्नांती सांगितले. तसेच अठरा वर्षांचे होताच मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. निवडणूक लढण्याची परवानगीदेखील याच वयात मिळावी. यासाठी केंद्र शासनाकडे मुद्दा उपस्थित केल्याचे ते म्हणाले. सगळे प्रश्न एका काचेच्या बाऊलमध्ये चिठ्ठीच्या स्वरूपात ठेवले होते. गर्दीतून एकाला बोलवून चिठ्ठी काढून प्रश्न विचारले गेले. सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

भविष्यात निवडणुकीच्या मैदानात येणारलोकसभा निवडणूक लढणार काय? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे म्हणाले, मला निवडणूक लढवायला आवडेल. भविष्यात मला तुम्ही निवडणुकीच्या मैदानात पाहाल. सध्या दुष्काळी भाग पाहतो आहे. लोकांचे प्रश्न सोडविले तर पक्ष तुमच्या मागे येतील. प्रत्येकाने राजकारणापेक्षा इतर क्षेत्रातही गेले पाहिजे. वचननाम्यात जे बोललो ते करून दाखवितो. मी वचन दिले तर मागे हटू श्कत नाही. समवयस्कांचे मी नेहमीच ऐकतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aditya Thackreyआदित्य ठाकरेaurangabad-pcऔरंगाबाद