शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मित्राच्या वरातीत नाचताना रस्त्याशेजारील विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:27 IST

लग्नाची वरात निघाल्यानंतर नवरदेवासमोर डीजेच्या तालावर सर्व जण थिरकत होते.

ठळक मुद्देवरातीच्या मार्गावर विनाकठड्याची विहीर आहे.अंधारात तरुणाला विहीर दिसली नाही आणि तो त्यात कोसळला

औरंगाबाद : कच्ची घाटी (ता. औरंगाबाद) येथे मित्राच्या लग्नाच्या वरातीत नाचत असताना रस्त्याशेजारील विनाकठड्याच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजता घडली. याविषयी चिकलठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सचिन गोरखनाथ आरते (२४, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे मयताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार सचिन यांच्या मित्राचा लग्नसमारंभ कच्ची घाटी येथे रविवारी रात्री आयोजित केला होता. लग्नाची वरात निघाल्यानंतर नवरदेवासमोर डीजेच्या तालावर सर्व जण थिरकत होते. वरातीच्या मार्गावर विनाकठड्याची विहीर आहे. अंधारात सचिन यांना ही विहीर दिसली नाही आणि ते पाय घसरून पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले.

यानंतर गावातील तरुण आणि मित्रांनी त्याला तत्काळ विहिरीतून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. सचिन नारायण औटे आणि अन्य एकाने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून रात्री पावणेअकरा वाजता मयत घोषित केले. पोलीस हवालदार रवी साळवे आणि अजित हेकडे हे या घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद