शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

एकरी २०० टन उत्पादन, उसासारखा भाव; गडकरींनी शेतकऱ्यांना दिला 'हे' पिक घेण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:17 IST

इलेक्ट्रिक वाहने, ईथेनॉल, सीएनजी, आदींचा वापर वाढवून आगामी पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचा वापर संपुष्टात आणण्यात येईल

पैठण: बांबू ईकोनॉमी गरजेची असून देशात रस्त्याच्या बाजूला बांबू लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी बांबूचे उत्पादन घ्यावे, एका एकरात २०० टन बांबू होतो. बांबू सर्वात जास्त कार्बनडाय ऑक्साईड सोसून घेतो. वीज निर्मितीसाठी कोळशाऐवजी बांबूचा वापर करता येतो. यामुळे स्वस्तात वीजनिर्मिती होईल, देशाचे १६ लाख कोटी रुपये वाचून ते शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाता बनेल. यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमात केले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडलेल्या ५१ वटवृक्षाचे पुनर्रोपण पैठण येथे यशस्वी करण्यात आले आहे. या पुनर्रोपित वटवृक्षाची पाहणी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री संदीपान भुमरे, अभिनेता सयाजी शिंदे, भाजपाच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे व एन. एच. आय.चे अधिकारी उपस्थित होते. ५१ वटवृक्षाचे यशस्वी पुनर्रोपण करण्याचा देशातील पहिला प्रयोग असल्याचे सांगून गडकरी यांनी सयाजी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच प्राधिकरणाच्या वतीने देशात साडेतीन कोटी झाडांचे रोपण करण्यात आले असून या वर्षात ६१ हजार झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

पैठण-पंढरपूर पालखी मार्गाच्या बाबतीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मागणी केल्यानंतर या कामाच्या भूसंपादन करण्यासाठी वेळ लागला; परंतु दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करून रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी येईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर-पुणे द्रुतगती मार्गास लवकरच मंजुरी मिळेल. तसेच महामार्गावरील वाहनाच्या गती संदर्भात दोन दिवसांत नोटिफिकेशन निघणार असून गती वाढवून दिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले; परंतु याबाबत राज्य सरकारही वेगळा निर्णय घेऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल, डिझेलचा वापर पाच वर्षात संपुष्टात आणणार इलेक्ट्रिक वाहने, ईथेनॉल, सीएनजी, आदींचा वापर वाढवून आगामी पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचा वापर संपुष्टात आणण्यात येईल, तसेच देशात सीएनजी व ईथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन  गडकरी यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीFarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद