शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

पहिल्या दिवशी २२ % विद्यार्थ्यांचे 'येस सर'; औरंगाबाद ग्रामीणमध्ये 406 शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 12:09 IST

वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला.

ठळक मुद्देतपासणीअभावी १७९ शाळा बंदचशहरालगतच्या गावांत शाळा सुरु करण्यास विरोध 

औरंगाबाद : जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या ५८५ पैकी ४०६ शाळा सोमवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी १७ हजार २७५  म्हणजे २२ टक्के विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत आले. १७९ शाळा विविध कारणांनी सोमवारी सुरू होऊ शकल्या नाहीत. 

राज्य शासनाने दिलेले आदेश व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नववी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग सुरु झाले. जिल्हा परिषदेच्या ५५ माध्यमिक शाळा आहेत. तर ५३५ शाळा या संस्थांच्या आहेत. यातील तपासणी झालेल्या शिक्षकांचे अहवाल सोमवारपर्यंत उपलब्ध झाले नव्हते. शिक्षणविभागाकडून त्यांना रिपोर्ट येईपर्यंत शाळेत उपस्थित होऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. मंगळवारपर्यंत बहुतांश अहवाल मिळतील. त्यानंतर शिक्षक हजर होऊन सुरु न झालेल्या शाळाही सुरु होतील. तर सुमारे ७०० शिक्षकांनी अद्याप तपासणी करुन घेतली नाही. त्यांनीही तात्काळ तपासणी करुन शाळेत हजर व्हावे असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी केले. 

शहरालगतच्या गावांत शाळा सुरु करण्यास विरोध वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला. मात्र, जिल्हाधिकारी यांच्याकडून अद्याप त्या शाळासंदर्भात कोणतेही स्वतंत्र आदेश नाही, असेही डाॅ. चव्हाण यांनी सांगितले. 

शहरात ३०, तर ग्रामीणमध्ये ७० टक्के खाजगी शिकवण्या सुरू केल्याचा दावाशहरातील ३० टक्के, तर ग्रामीणमधील ७० टक्क्यांपेक्षा अधिक खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस सोमवारपासून सुरू केल्याची माहिती कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी दिली. आई, वडील, विद्यार्थ्यांचे हमीपत्र, आरोग्य अधिकाऱ्यांचे  प्रमाणपत्र, शासनाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन यात केले असून पुढील दोन- तीन दिवसांत बहुतांश क्लासेस सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या ८ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने त्यावर उदरनिर्वाह असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. शाळांप्रमाणे क्लासेसही सुरू करावेत अन्यथा आत्मदहनाचा इशारा संघटनांनी दिला होता. त्यासाठी आंदोलनेही केली, तरीदेखील शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर क्लासेस चालकांनी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरू झालेल्या क्लासेसमध्ये प्रामुख्याने दहावी व बारावीच्या क्लासेसचा समावेश आहे. राज्यभरात ५० टक्के क्लासेस सुरू झाल्याचे मांडकीकर यांनी कळविले आहे.  खाजगी शिक्षकांनीही तपासण्या करून घेऊन ज्ञानदान सुरू केल्याचा दावा त्यांनी केला.  लवकरच शाळा, महाविद्यालयांप्रमाणे कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भात सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे करण्यात आली.

शहरात ५९८ शिक्षकांची कोरोना टेस्टशहरातील माध्यमिक विभागाच्या शाळा ३ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, शिक्षकांना शा‌ळेत जाणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची केली आहे. सोमवारी ५९८ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. रविवारी २९८ शिक्षकांची तपासणी झाली होती. त्यामध्ये १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले.  आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी