शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

पहिल्या दिवशी २२ % विद्यार्थ्यांचे 'येस सर'; औरंगाबाद ग्रामीणमध्ये 406 शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 12:09 IST

वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला.

ठळक मुद्देतपासणीअभावी १७९ शाळा बंदचशहरालगतच्या गावांत शाळा सुरु करण्यास विरोध 

औरंगाबाद : जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या ५८५ पैकी ४०६ शाळा सोमवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी १७ हजार २७५  म्हणजे २२ टक्के विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत आले. १७९ शाळा विविध कारणांनी सोमवारी सुरू होऊ शकल्या नाहीत. 

राज्य शासनाने दिलेले आदेश व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नववी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग सुरु झाले. जिल्हा परिषदेच्या ५५ माध्यमिक शाळा आहेत. तर ५३५ शाळा या संस्थांच्या आहेत. यातील तपासणी झालेल्या शिक्षकांचे अहवाल सोमवारपर्यंत उपलब्ध झाले नव्हते. शिक्षणविभागाकडून त्यांना रिपोर्ट येईपर्यंत शाळेत उपस्थित होऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. मंगळवारपर्यंत बहुतांश अहवाल मिळतील. त्यानंतर शिक्षक हजर होऊन सुरु न झालेल्या शाळाही सुरु होतील. तर सुमारे ७०० शिक्षकांनी अद्याप तपासणी करुन घेतली नाही. त्यांनीही तात्काळ तपासणी करुन शाळेत हजर व्हावे असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी केले. 

शहरालगतच्या गावांत शाळा सुरु करण्यास विरोध वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला. मात्र, जिल्हाधिकारी यांच्याकडून अद्याप त्या शाळासंदर्भात कोणतेही स्वतंत्र आदेश नाही, असेही डाॅ. चव्हाण यांनी सांगितले. 

शहरात ३०, तर ग्रामीणमध्ये ७० टक्के खाजगी शिकवण्या सुरू केल्याचा दावाशहरातील ३० टक्के, तर ग्रामीणमधील ७० टक्क्यांपेक्षा अधिक खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस सोमवारपासून सुरू केल्याची माहिती कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी दिली. आई, वडील, विद्यार्थ्यांचे हमीपत्र, आरोग्य अधिकाऱ्यांचे  प्रमाणपत्र, शासनाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन यात केले असून पुढील दोन- तीन दिवसांत बहुतांश क्लासेस सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या ८ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने त्यावर उदरनिर्वाह असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. शाळांप्रमाणे क्लासेसही सुरू करावेत अन्यथा आत्मदहनाचा इशारा संघटनांनी दिला होता. त्यासाठी आंदोलनेही केली, तरीदेखील शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर क्लासेस चालकांनी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरू झालेल्या क्लासेसमध्ये प्रामुख्याने दहावी व बारावीच्या क्लासेसचा समावेश आहे. राज्यभरात ५० टक्के क्लासेस सुरू झाल्याचे मांडकीकर यांनी कळविले आहे.  खाजगी शिक्षकांनीही तपासण्या करून घेऊन ज्ञानदान सुरू केल्याचा दावा त्यांनी केला.  लवकरच शाळा, महाविद्यालयांप्रमाणे कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भात सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे करण्यात आली.

शहरात ५९८ शिक्षकांची कोरोना टेस्टशहरातील माध्यमिक विभागाच्या शाळा ३ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, शिक्षकांना शा‌ळेत जाणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची केली आहे. सोमवारी ५९८ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. रविवारी २९८ शिक्षकांची तपासणी झाली होती. त्यामध्ये १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले.  आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी