शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जायकवाडी तुडुंब असल्याने यावर्षी पूर्ण क्षमतेने आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:18 IST

धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे.

ठळक मुद्देरबी हंगातील एक आवर्तन झालेले आहे, तर एक आवर्तन आताच सोडण्यात आलेले आहे. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत ४ पाणीपाळी देण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे जायकवाडीतून उन्हाळी हंगामात पूर्ण क्षमतेने आवर्तन देण्याचे सूतोवाच गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

गुरुवारी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानबाद, लातूर जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पाच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. याबाबत माहिती देताना टोपे म्हणाले,  जायकवाडीत १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. धरणावर अवलंबून असलेल्यांना पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणीपुरवठा योजनांना ३१ जुलै २०२० अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आहे. रबी हंगातील एक आवर्तन झालेले आहे, तर एक आवर्तन आताच सोडण्यात आलेले आहे. उन्हाळी हंगामात मार्च ते जून या कालावधीत ४ पाणीपाळी देण्यात येणार आहेत. नांदूर मधमेश्वरमधून रबी हंगामात एक, तर उन्हाळी हंगामात २ आवर्तने दिली जाणार आहेत. निम्म दुधनात १३.३८ टक्केच पाणी असल्याने रबीसाठी एक अवर्तन देण्यात येणार आहे. माजलगाव प्रकल्पातून रबीसाठी २ व उन्हाळ्यात ४ आवर्तने दिली जातील. निम्म तेरणातून केवळ रबीसाठी ३ आवर्तने निश्चित केली आहे. मांजराचे  पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे.

२०४१ मध्ये हक्काच्या पाण्यावर गदाबैठकीत आ. अंबादास दानवे आणि प्रशांत बंब यांनी नांदूर-मधमेश्वर प्रकल्पात आरक्षण वाढविण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे आरक्षण वाढत गेले, तर २०४१ पर्यंत हक्काचे पाणी मिळणार नाही. त्या-त्या काळात दिल्या गेलेल्या आरक्षणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत शासनस्तरावर पुनर्विचार करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

७० टक्के जागा रिक्तजलसंपदा विभागात ७० टक्के कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त आहेत. कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण येतो. त्यामुळे निवृत्त कर्मचारी, कं त्राटी पद्धतीने घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे टोपे म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती