शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीची वर्षपूर्ती; आठ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 19:19 IST

पोलिसांनी ११० दंगलखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

ठळक मुद्दे११ मे रोजी रात्री मोतीकारंजा येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झालीदगडफेक आणि लुटालुटीचे प्रकार दुसऱ्या दिवशी १२ मे रोजीही रात्रभर सुरू

औरंगाबाद : गतवर्षी किरकोळ कारणावरून दोन समुदायांत झालेल्या भीषण दंगलीला ११ मे रोजी वर्ष होत आहे. या दंगलीनंतर दोन समुदायांत निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सातत्याने प्रयत्न केले. याप्रकरणी सिटीचौक, क्र ांतीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात एकूण १६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या सर्व गुन्ह्यांत पोलिसांनी ११० दंगलखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, अटकेतील आरोपी जामिनावर आहेत.

सूत्रांनी सांगितले की, ११ मे रोजी रात्री मोतीकारंजा येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीचे रुपांतर दंगलीत झाले. राजाबाजार, मोतीकारंजा, नवाबपुरा, शहागंज, चेलीपुरा आदी भागांत जाळपोळ, दगडफेक आणि लुटालुटीचे प्रकार दुसऱ्या दिवशी १२ मे रोजीही रात्रभर सुरू होते. एसआरपी आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या जोरदार कारवाईनंतर दंगलीवर नियंत्रण आणणे शक्य झाले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात एका मुलाचा तर दंगेखोरांनी घराला लावलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला.

याशिवाय दगडफेक आणि पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्यांची संख्या ३० हून अधिक होती. मात्र, जखमींपैकी मोजकेच चार ते पाच जण सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. उर्वरित जखमींनी खाजगी आणि बाहेरगावच्या रुग्णालयात उपचार घेतल्याने त्यांची नावे समजू शकली नव्हती. यावेळी जमावाने केलेल्या जाळपोळ, लुटालूट आणि दगडफेकीत कोट्यवधींचे नुकसान झाले. या दंगलीप्रकरणी सिटीचौक  ठाण्यात दहा, जिन्सी आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन, असे एकूण १६ गुन्हे पोलिसांनी नोंदविले होते. यापैकी गुन्ह्यांचा तपास करून दोन नगरसेवकांसह एकूण ११० आरोपींना अटक केली आणि त्यांच्याविरोधात न्यायालयात ८ गुन्ह्यांत दोषारोपपत्रे दाखल केली. तर ३ गुन्ह्यांत ‘अ’ समरी तर एका गुन्ह्यात ‘ब’ समरी अहवाल पाठविला. ४ गुन्ह्यांचा तपास चालू आहे.

जखमी एसीपी आले मृत्यूच्या दाढेतून बाहेरया दंगलीत तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह पाच अधिकारी आणि सुमारे २५ कर्मचारी जखमी झाले होते. जखमींपैकी कोळेकर यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत्यूच्या दाढेत गेले होते. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कोळेकर हे बचावले, मात्र त्यांना तब्बल चार महिने उपचार घ्यावे लागले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस