शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीची वर्षपूर्ती; पंचनामे कागदावरच, नुकसानभरपाईची प्रतीक्षा अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 19:25 IST

६४ वाहने, ७५ घरे व दुकानांची झाली होती राख 

औरंगाबाद : शहरात ११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीत दुकान, वाहन व घर या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे वर्र्षभरापासून कागदावरच आहेत. 

दंगलीतील नुकसानीचा अंदाज नागरिकांच्या बयानातून (जबाब) बांधण्यात आला होता. त्या दंगलीत ६४ वाहने, ७५ घरे व दुकानांचे नुकसान झाले होते. १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यात करून शासनाकडे पाठविली होती. परंतु अजून शासनाकडून काहीही मदत मिळालेली नाही. अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, सतीश सोनी यांच्या पथकांनी पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासनाकडे सादर केला होता.

राजाबाजार, नवाबपुरा, मोतीकारंजा, गुलमंडी, शहागंज येथे नुकसान झालेल्या पंचनाम्याची मूळ व बयानांची प्रत अहवालासोबत दिली होती. दंगलीत ६४ वाहने जळाली होती. १ कोटी २७ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे ते नुकसान होते. तसेच ७५ घर  व दुकानधारकांच्या जबाबानुसार नुकसानीची रक्कम ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० रुपये इतकी गृहीत धरली होती. एकूण १३९ नागरिकांचे नुकसान त्या दंगलीत झाले होते. जबाबानुसार १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे ते नुकसान होते. महसूल, पीडब्ल्यूडी, मनपा, सिटी सर्व्हे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून त्या नुकसानीची पाहणी केली होती. दरम्यान अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले, अद्याप शासनाकडून मदतीबाबत काहीही सूचना आलेल्या नाहीत.

दंगलीतील नुकसान असे होते- वाहने   :         ६४- घरे व दुकाने    :  ७५- वाहनांचे नुकसान   :  १ कोटी २७ लाख ७३ हजार ५००- घर, दुकानांचे नुकसान   :  ८ कोटी ९३ लाख ४२ हजार १०० - एकूण नुकसानधारक   :  १३९- एकूण नुकसान : १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपये  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस