शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा कपाशी क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:28 IST

कमी व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. अशातच अलीकडे कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांचे अर्थकारणच बिघडून गेले.

ठळक मुद्देबोंडअळीचा धाक : खरीप लागवड क्षेत्रात ३० हजार हेक्टरने वाढ अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कमी व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. अशातच अलीकडे कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांचे अर्थकारणच बिघडून गेले. याच्या धाकापोटी यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात सुमारे ३० हजार हेक्टरची घट अपेक्षित असल्याचे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी व्यक्त केले.कायम दुष्काळी म्हणून औरंगाबाद जिल्हा ओळखला जातो. तरीही हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. जिल्ह्यात यंदा ७ लाख २० हजार हेक्टर एवढे खरीप हंगामाचे लागवडीचे सरासरी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामात यंदा पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या ४८ हजार ९६४ क्विंटल बियाणांची आवश्यकता असून, त्यादृष्टीने जि.प. कृषी विभागाने पूर्वतयारी केली आहे. बियाणांची कमतरता भासणार नाही, असेही कृषी विकास अधिकारी गंजेवार यांनी सांगितले.गेल्या वर्षी जिल्ह्यात ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपामध्ये पेरणी झाली होती. यंदा ७ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे कंबरडे मोडले. हाती आलेले पीक बोंडअळीने फस्त केल्यामुळे शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली, असे असले तरी अनियमित पावसामुळे शेतकºयांसमोर या नगदी पिकाशिवाय दुसरा पर्याय नाही. जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र असले तरी गेल्या वर्षी जिल्ह्यात ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे.खते व बियाणे कमी पडणार नाहीतकृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार म्हणाले की, खरीप हंगामात खते व बियाणांची कमतरता भासणार नाही. मात्र, मागील वर्षी कापसाच्या पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकºयांनी पाऊस पडल्याशिवाय पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळावी. कपाशीनंतर जिल्ह्यात मका पिकाला प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेण्यात आले. यंदा १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे. यासाठी २९ हजार क्विंटल बियाणांची गरज असून कपाशीच्या बियाणांची १८ लाख ८६ हजार पाकिटे लागतील.

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र