शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा कपाशी क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:28 IST

कमी व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. अशातच अलीकडे कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांचे अर्थकारणच बिघडून गेले.

ठळक मुद्देबोंडअळीचा धाक : खरीप लागवड क्षेत्रात ३० हजार हेक्टरने वाढ अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कमी व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. अशातच अलीकडे कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांचे अर्थकारणच बिघडून गेले. याच्या धाकापोटी यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात सुमारे ३० हजार हेक्टरची घट अपेक्षित असल्याचे मत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी व्यक्त केले.कायम दुष्काळी म्हणून औरंगाबाद जिल्हा ओळखला जातो. तरीही हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. जिल्ह्यात यंदा ७ लाख २० हजार हेक्टर एवढे खरीप हंगामाचे लागवडीचे सरासरी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामात यंदा पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या ४८ हजार ९६४ क्विंटल बियाणांची आवश्यकता असून, त्यादृष्टीने जि.प. कृषी विभागाने पूर्वतयारी केली आहे. बियाणांची कमतरता भासणार नाही, असेही कृषी विकास अधिकारी गंजेवार यांनी सांगितले.गेल्या वर्षी जिल्ह्यात ६ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपामध्ये पेरणी झाली होती. यंदा ७ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे कंबरडे मोडले. हाती आलेले पीक बोंडअळीने फस्त केल्यामुळे शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली, असे असले तरी अनियमित पावसामुळे शेतकºयांसमोर या नगदी पिकाशिवाय दुसरा पर्याय नाही. जिल्ह्यात कापसाचे ४ लाख ३८ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र असले तरी गेल्या वर्षी जिल्ह्यात ४ लाख ७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड अपेक्षित आहे.खते व बियाणे कमी पडणार नाहीतकृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार म्हणाले की, खरीप हंगामात खते व बियाणांची कमतरता भासणार नाही. मात्र, मागील वर्षी कापसाच्या पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकºयांनी पाऊस पडल्याशिवाय पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळावी. कपाशीनंतर जिल्ह्यात मका पिकाला प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेण्यात आले. यंदा १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे. यासाठी २९ हजार क्विंटल बियाणांची गरज असून कपाशीच्या बियाणांची १८ लाख ८६ हजार पाकिटे लागतील.

टॅग्स :cottonकापूसAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र