शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

यंदा ४६ गावांत तंटामुक्ती मोहीम

By admin | Updated: May 28, 2014 00:40 IST

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून ५६५ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५१९ ग्रामपंचायतींनी तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले आहेत. आता उर्वरित ४६ ग्रामपंचायतींसाठी तंटामुक्ती मोहिम राबविली जाणार असून त्यासाठीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांना तंटामुक्त करण्यासाठी समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील ४९ पैकी ३९ गावे तंटामुक्त झाली असून १० गावे शिल्लक आहेत. बासंबा ठाणे हद्दीतील ४९ पैकी ४० गावे तंटामुक्त ठरली असून ९ गावे बाकी आहेत. नर्सी नामदेव ठाणे हद्दीतील २० पैकी १६ गावे, गोरेगाव ठाणे हद्दीतील ३७ पैकी ३२ गावे, सेनगाव ठाणे हद्दीतील ५९ पैकी ४८ गावे, कळमनुरी ठाणे हद्दीतील ६८ पैकी ६४ गावे, आखाडा बाळापूर ठाणे हद्दीतील ७६ पैकी ७६ गावे तंटामुक्त झाली आहेत. औंढा नागनाथ ठाणे हद्दीतील ५७ पैकी ५६ गावे, हट्टा ठाणे हद्दीतील५६ पैकी ५५ गावे, कुरूंदा ठाणे हद्दीतील ५४ पैकी ५४ गावे तंटामुक्त झाली आहेत. वसमत ठाणे हद्दीतील ४० पैकी ३९ गावे तंटामुक्तीच्या पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. पुरस्कारासाठी शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील १० गावांचा समावेश आहे, अशी माहिती तंटामुक्ती समितीचे जिल्हा समन्वयक जमादार निजाम शेख यांनी दिली. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमुळे आलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यात या मोहिमेचे काम सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ३१ आॅगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृती न झाल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. हळूहळू वाढत गेला लोकसहभाग.जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली आहेत तर अजून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४६ गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांची निवड करून मोहिमेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. शिल्लक राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींमध्ये सेनगाव ठाणे हद्दीतील ११ व हिंगोली ग्रामीण हद्दीतील १० गावे आहेत.