शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘यशवंती वाचली पाहिजे’; अंधश्रद्धा, गैरसमजुतीमुळे घोरपडीची मोठ्या प्रमाणात हत्या

By साहेबराव हिवराळे | Updated: August 14, 2024 20:50 IST

घोरपड संवर्धन दिन : घोरपड ही उंदीर, घूस, त्रासदायक बिटल नामक किडे, गोगलगाई यावर उपजीविका करून शेतकऱ्यांना मदत करते.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासात ‘यशवंती’ घोरपड अजरामर झाली आहे. घोरपडीबद्दल शास्त्रीय माहिती दिलेली महाराजांची आज्ञा...‘यशवंती वाचली पाहिजे’ हे विशेष पोस्टर पर्यावरण संवर्धक अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांनी तयार केले असून, त्यावर घोरपडीची पर्यावरणातील भूमिका मांडली आहे. या वन्यजीव हत्येस आळा बसावा म्हणून जनजागृतीसाठी पोस्टर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, हॉटेल, धाबे आदी ठिकाणी लावण्यात येणार आहे.

का होते घोरपडीची हत्या?घोरपडीचे मांस लैंगिक सामर्थ्य वाढवते, चविष्ट असते यामुळे खाण्यासाठी. भानामती, जादूटोणासाठी नख व कातडी, खंजिरी हे वाद्य बनवण्यासाठी आणि पाठदुखी बरी होते, सांडेका तेल हे आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी घोरपडीची हत्या होते; परंतु ज्यास कुठला ही आधार नाही.

प्रबोधनाला यश...वन्यजीवांची हत्या करणाऱ्या केदारखेडा येथील जिंदगी भोसले या फासे पारध्याचे ३ वर्षांपूर्वी प्रबोधन केल्याने त्याने शिकार करणे सोडले. त्यास आर्थिक मदत केल्यानंतर जिंदगी आता कटलरीचा फिरता व्यवसाय करतो आहे. त्याच जिंदगीच्या भावकीतील तुंबा भोसले या शिकाऱ्याचे प्रबोधन केल्याने त्यानेही घोरपड व अन्य वन्यजीवांची शिकार करणे सोडून दिले.

वनविभागाकडे सुपुर्दया पारध्याने तंत्रमंत्रासाठी वापरली जाणारी घोरपडीची कातडी, नखे सायळची काटे, रानडुकराचे सुळे आदी वस्तू त्याने स्वतःहून आणून दिल्या. पाटील यांनी त्या वनविभागाकडे सुपुर्द केल्या.

अंधश्रद्धेचा बळी-हातजोडीजादूटोणा करणारे हातजोडी नावाची वनस्पती धन काढण्यासाठी वापरतात. ही वनस्पती आता जवळपास नष्ट झाली आहे. त्या ऐवजी भोंदूगिरी करणारी ही मंडळी हुबेहूब हातजोडी सारखे दिसणारे घोरपडीचे अंडाशय व लिंगाची जोडी हजारो रुपयांना विकतात. त्यासाठी घोरपडीचा बळी दिला जातोय.

घोरपड अन्नसाखळीचा दुवाघोरपड ही उंदीर, घूस, त्रासदायक बिटल नामक किडे, गोगलगाई यावर उपजीविका करून शेतकऱ्यांना मदत करते. ती मृत प्राण्यांचे मांस खाते. नैसर्गिक स्वच्छता रक्षकही आहे. ‘आफ्रिकन गोगलगाय’ ही घोरपडीचे भक्ष्य आहे. आता घोरपड नवीन कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल १मध्ये संरक्षित वन्यजीव आहे.-डॉ. संतोष पाटील, उपाध्यक्ष, पर्यावरण संवर्धक अभिनव प्रतिष्ठान

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद